श्री गणेशाय नमः ॥ निर्मिली सुंदर देवमंदिरे । चौक बैठका नाना प्रकारे । कळस ठेवल्यावरी सारे । पूर्ण झाले म्हणती त्या ॥१॥ स्वामीचरित्र सारामृत । झाले वीस अध्यायापर्यंत । करोनी माझे मुख निमित्त । वदले श्रीस्वामीराज ॥२॥ आता कळसाध्याय एकविसावा । कृपा करोनी वदवावा । हा ग्रंथ संपूर्ण करा...वा । भक्तजनांकारणे ॥३॥ संपवावा अवतार आता । ऐसे मनामाजी येता । जडदेह त्यागोनि तत्त्वता । गेले स्वस्थानी यतिराज ॥४॥ शके अठराशे पूर्ण । संवत्सर ते बहुधान्य । मास चैत्र पक्ष कृष्ण । त्रयोदशी मंगळवार ॥५॥ दिवस गेला तीन प्रहर । चतुर्थ प्रहाराचा अवसर । चित्त करोनी एकाग्र । निमग्न झाले निजरुपी ॥६॥ षटचक्राते भेदोन । ब्रह्मरंध्रा छेदून । आत्मज्योत निघाली पूर्ण । हदयामधुनी तेधवा ॥७॥ जवळ होते सेवेकरी । त्यांच्या दुःख झाले अंतरी । शोक करीता नानापरी । तो वर्णिला न जाय ॥८॥ अक्कलकोटीचे जन समस्त । दुःखे करुन आक्रंदत । तो वृत्तान्त वर्णिता ग्रंथ । वाढेल समुद्रसा ॥९॥ असो स्वामींच्या अनंत लीला । जना सन्मार्ग दाविला । उद्धरिले जडमूढाला । तो महिमा कोण वर्णी ॥१०॥ कोकणांत समुद्रतीरी । प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी । पालशेत ग्रामामाझारी । जन्म माझा झालासे ॥११॥ श्रेष्ठ चित्तपावन ज्ञातीत । उपनाम असे थोरात । बळवंत पार्वतीसुत । नाम माझे विष्णू असे ॥१२॥ तेथेचि बाळपण गेले । आता कोपरलीस येणे केले । उपशिक्षक पद मिळाले । विद्यालयी सांप्रत ॥१३॥ वाणी मारवाडी श्रेष्ठ । नाम ज्यांचे शंकरशेट । त्यांसी स्नेह झाला निकट । आश्रयदाते ते माझे ॥१४॥ त्यांची स्वामीचरणी भक्ती । भावार्थे पूजन करिती । दिवसा उपजली चित्ती । स्वामीचरित्र श्रवणाची ॥१५॥ ते मजला सांगितले । मी स्वामी गुणानुवाद गाइले । हे स्वामी चरित्र लिहिले । अल्प मतीने अत्यल्प ॥१६॥ शब्द सोपे व्यावहारिक भाषा । प्रत्येक अध्याय लहानसा । आबालवृद्धा समजे असा । लघु ग्रंथ्र रचिला हा ॥१७॥ प्रथमाध्यायी मंगलाचरण । कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन । आधार स्वामी चरित्रास कोण । हेचि कथन केलेसे ॥१८॥ श्रीगुरु कर्दळीवनातूनी आले । स्वामीरुपे प्रगटले । भुवरी प्रख्यात झाले । हे कथन द्वितीयाध्यायी ॥१९॥ तारावया भक्तजनांला । अक्कलकोटी प्रवेश केला । तेथीचा महिमा वर्णिला । तृतीयाध्यायी निश्चये ॥२०॥ स्वामींचा करावया छळ । आले दोन संन्यासी खल । तेचि वृत्त सकल । चवथ्यामाजी वर्णिले ॥२१॥ मल्हारराव राजा बडोद्यासी । त्याने न्यावया स्वामीसी । पाठविले कारभार्यासी । पाचव्यांत ते कथा ॥२२॥ यशवंतराव सरदार । त्यासी दाविला चमत्कार । तयांचे वृत्त समग्र । सहाव्यात वर्णिले ॥२३॥ विष्णुबुवा ब्रह्मचारी । त्यांची स्वामीचरणांवरी । भक्ती जडली कोणे प्रकारी । ते सातव्यात सांगितले ॥२४॥ शंकर नामे एक गृहस्थ । होता ब्रह्मासमधे ग्रस्त । त्यासी केले दुःखमुक्त । आठव्यात ते कथा ॥२५॥ खर्चोनिया द्रव्य बहुत । त्यांनी बांधिला सुंदर मठ । ते वर्णन समस्त । नवव्यात केलेसे ॥२६॥ चिदंबर दीक्षितांचे वृत्त । वर्णिले दशमाध्यायात । ते ऐकता पुनीत । होती सत्यचि ॥२७॥ अकरावा आणि बारावा । तैसाचि अध्याय तेरावा । बाळाप्पाचा इतिहास बरवा । त्यामाजी निरुपिला ॥२८॥ भक्तिमार्ग निरुपण । संकलित केले वर्णन । तो चवदावा अध्याय पूर्ण । सत्तारक भाविका ॥२९॥ बसप्पा तेली सदभक्त । तो कैसा झाला भाग्यवंत । त्याची कथा गोड बहुत । पंधराव्यांत वर्णिली ॥३०॥ हरीभाऊ मराठे गृहस्थ । कैसे झाले स्वामीभक्त । सोळा सतरा यात निश्चित । वृत्त त्यांचे वर्णिले ॥३१॥ स्वामीसुतांचा कनिष्ठ बंधू । त्यासी लागला भजनछंदू । जे दादाबुवा प्रसिद्धु । अठाराव्यात वृत्त त्यांचे ॥३२॥ वासुदेव फडक्यांची गोष्ट । आणि तात्यांचे वृत्त । वर्णिले एकोणविसाव्यांत । सारांशरुपे सत्य पै ॥३३॥ एक गृहस्थ निर्धन । त्यासी आले भाग्य पूर्ण । तेचि केले वर्णन । विसाव्यांत निर्धारे ॥३४॥ स्वामी समाधिस्त झाले । एकविसाव्यांत वर्णिले । ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदिले । पूर्ण केले स्वामीचरित्र ॥३५॥ शके अठराशे एकोणवीस । वसंतऋतू चैत्र मास । गुरुवार वद्य त्रयोदशीस । पूर्ण केला ग्रंथ हा ॥३६॥ बळवंत नामे माझा पिता । पार्वती माता पतिव्रता । वंदोनी त्या उभयंता । ग्रंथ समाप्त केलासे ॥३७॥ स्वामीनी दिधला हा वर । जो भावे वाचील हे चरित्र । त्यासी आयुरारोग्य अपार । संपत्ती, संतति प्राप्त होय ॥३८॥ त्याची वाढो विमल कीर्ति । मुखी वसो सरस्वती । भवसागर तरोन अंती । मोक्षपद मिळो त्या ॥३९॥ अंगी सर्वदा विनय वसो । वृथाभिमान तो नसो । सर्व विद्यासागर गवसो । भक्तश्रेष्ठा लागूनी ॥४०॥ ज्या कारणे ग्रंथ रचिला । जिही प्रसिद्धीस आणिला । त्यासी रक्षावे दयाळा । कृपाघना समर्था ॥४१॥ मी केवळ मतिमंद । परी भावे घेतला छंद । कृपाळू तू सच्चिदानंद । पूर्ण केला दयाळुवा ॥४२॥ दोन्ही कर जोडोनी । आता हेचि विनवणी । ग्रंथसंरक्षकालोगोनि । सुखी ठेवी दयाळा ॥४३॥ आता ज्ञानी वाचक असती । त्यास करु एक विनंती । मी केवळ हीनमति । कवित्व करु नेणेची ॥४४॥ परी माझी ही आर्ष उत्तरे । वाचावी ऐकावी आदरे । उबग न मानावा चतुरे । स्वामीचरित्र म्हणोनी ॥४५॥ जयजयाजी परमानंदा । वैकुंठवासी श्रीगोविंदा । भक्ततारका आनंदकंदा । अनामातीता अभेदा ॥४६॥ अरिमर्दना सर्वेशा । विश्वंभरा अविनाशा । पुराणपुरुषा अनंतवेशा । भवपाशा सोडवी ॥४७॥ जयजयाजी कमलासना । कमलावरा कमलनयना । विधितात कमलवदना । हदयकमली वसावे ॥४८॥ मत्स्य कूर्म वराह जाण । नृसिंह आणि वामन । परशुराम दशरथनंदन । कृष्ण बौद्ध कलंकी तू ॥४९॥ स्वामीचरित्र सुंदर उद्यान । त्यातील कुसुमे वेचून । सुंदर माळ करोन । आला घेवोनी विष्णू कवि ॥५०॥ आपुल्या कंठी तात्काळ । घालोनी चरणी ठेविला भाल । सदोदित याचा प्रतिपाल । करावा बाळ आपुले ॥५१॥ इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । एकविसावा अध्याय गोड हा ॥५२॥ श्री स्वामीचरणार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
Swami Charitra Sharamsh
Tuesday, April 10, 2012
Monday, April 9, 2012
श्री स्वामी चरित्र सारामृत,अध्याय २०
श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणाकरा । जयजयाजी यतिवरा । भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥
लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी अनंता । विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥
तुझे चरित्र अगाध । केवी व...र्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥
तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥
तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥
वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥
अक्कलकोटी वास केला । जना दाखविल्या अनंत लीला । उद्धरिले कैक पाप्यला । अदभुत चरित्र स्वामींचे ॥७॥
असो कोणे एके दिवशी । इच्छा धरोनी मानसी । गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥
करोनिया श्रीची स्तुती । माथा ठेविला चरणावती । तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥
फकिराते देई खाना । तेणे पुरतील सर्व कामना । पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥
गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने । फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते ॥११॥
फकीर तृप्त होवोन जाती । उच्छिष्ट उरले पात्रावरती । तेव्ह समर्थ आज्ञापिती । गृहस्थाते सत्वर ॥१२॥
शेष अन्न करी ग्रहण । तुझे मनोरथ होतील पूर्ण । परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा ॥१३॥
म्हणे यवन यती अपवित्र । त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट । याती मध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे ॥१४॥
आला मनी ऐसा विचार । तो समर्थास कळला सत्वर । म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया ॥१५॥
इतक्यामाजी साहजिक । कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक । येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला ॥१६॥
दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन । भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन । द्रव्य मेळवाया साधन । त्याजवळी नसे परी ॥१७॥
त्यासी देखोन समर्थ । म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित । तो निःशंक मनांत । पात्रावरी बैसला ॥१८॥
त्यासी बोलले समर्थ । तु मुंबापुरी जाई त्वरित । सफल होतील मनोरथ । द्रव्यप्राप्ती होईल ॥१९॥
स्वामीवचनी भाव धरिला । तात्काळ मुंबईस आला । उगाच भटको लागला । द्रव्य मिळेल म्हणोनी ॥२०॥
प्रभात समयी एके दिवशी । गृहस्थ निघाला फिरायासी । येऊन एका घरापाशी । स्वस्थ उभा राहिला ॥२१॥
तो घरातून एक वृद्ध बाई । दार उघडोन घाईघाई । बाहेर येवोनिया पाही । गृहस्थ पडला दृष्टीसी ॥२२॥
तिने बोलाविले त्याला । आसनावरी बैसविला । दहा हजारांच्या दिधल्या । नोटा आणून सत्वरी ॥२३॥
गृहस्थ मनी आनंदला । बाईते आशीर्वाद दिधला । द्रव्यलाभ होता आला । शुद्धीवर सत्वर ॥२४॥
समर्थाचे वचन सत्य । गृहस्था आली प्रचीत । वारंवार स्तुती करीत । स्तोत्र गत स्वामीचे ॥२५॥
समर्थांचे लीला विचित्र । केवी वंदू शके मी पामर । ज्या वर्णिता थोर थोर । श्रमित झाले कविराज ॥२६॥
कोणी दाता नृपवर । दान कराया भांडार । मोकळे करी परी शक्त्यनुसार । याचक नेती बांधोनी ॥२७॥
षड्रस अन्नाचे ढीग पडले । क्षुधित जन तेथे आले । त्यांनी त्यातून भक्षिले । क्षुधा शांत होई तो ॥२८॥
स्वामीचरित्र भांडारातून । रत्ने घेतली निवडोन । प्रेमादरे माळ करोन । श्रोतयांचे कंठी घातली ॥२९॥
श्री स्वामीचरणसरोजी । विष्णुभ्रमर घाली रुंजी । अत्यादरे चरण पूजी । स्तोत्र गातसे ॥३०॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । विसावा अध्याय गोड हा ॥३१॥
॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
श्री स्वामी चरित्र सारामृत,अध्याय १९
श्री गणेशाय नमः ॥ एकाग्रचित्ते करिता श्रवण । तेणे होय दिव्य ज्ञान । त्या ज्ञाने परमार्थसाधन । पंथ सुलभ होतसे ॥१॥
सच्चरित्रे श्रवण करिता । परमानंद होय चित्ता । ओळखू ये सत्यासत्यता । परमार्थ प्रपंचाची ॥२...॥
या नरदेहा येवोन । काय करावे आपण । जेणे होईल सुगम । दुस्तर हा भवपंथ ॥३॥
ज्यांसी वानिती भले । सज्जन ज्या मार्गे गेले । सर्व दुःखमुक्त झाले । तो पंथ धरावा ॥४॥
बोलणे असो हे आता । वर्णूं पुढे स्वामीचरिता । अत्त्यादरे श्रवण करिता । सर्वार्थ पाविजे निश्चये ॥५॥
प्रसिद्ध आळंदी क्षेत्री । नामे नृसिंहसरस्वती । जयांची सर्वत्र ख्याती । अजरामर राहिली ॥६॥
कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र । ती देखिली त्यांनी समस्त । नाना योग्याभासी बहुत । महासाधू देखिले ॥७॥
करावे हठयोगसाधन । ऐसी इच्छा बहुत दिन । नाना स्थाने फिरोन । शोध करीती गुरुचा ॥८॥
जपी तपी संन्यासी । देखिले अनेक तापसी । जे सदा अरण्यवासी । योगाभ्यासी बैसले ॥९॥
एक सूर्यमंडळ विलोकिती । एक पंचाग्निसाधन करिती । एक वायू भक्षिताती । मौन धरिती कितीएक ॥१०॥
एक झाले दिगंबर । एकी केला उर्ध्व कर । एक घालिती नमस्कार । एक ध्यानस्थ बैसले ॥११॥
एक आश्रमी राहोन । शिष्या सांगती गुह्यज्ञान । एक करिती तीर्थाटन । एक पूजनी बैसले ॥१२॥
ऐसे असंख्य देखिले । ज्ञान तयांचे पाहिले । कित्येकांचे चरण धरिले । परि गेले व्यर्थची ॥१३॥
ठयोग परम कठीण । कैसा करावा साध्य आपण । याविषयी पूर्ण ज्ञान । कोणी तयाते सांगेना ॥१४॥
एके समयी अक्कलकोटी । स्वामीदर्शनेच्छा । धरुनी पोटी । आले नृसिंहसरस्वती । महिमा श्रीचा ऐकोनी ॥१५॥
नृसिंहसरस्वती दर्शनासी । येती कळले समर्थांसी । जाणिले त्यांच्या हदगतासी । अंतरामाजी आधीच ॥१६॥
सन्मुख पाहोनी तयांना । आज्ञाचक्र भेदांतला । एक श्लोक सत्वर म्हटला । श्रवणी पडला तयांच्या ॥१७॥
श्लोक ऐकता तेथेचि । समाधी लागली साची । स्मृति न राहिली देहाची । ब्रह्मारंध्री प्राणवायू ॥१८॥
आश्चर्य करिती सकळ । असो झालिया काही वेळ । समाधी उतरोनी तत्काळ । नृसिंहसरस्वती धावले ॥१९॥
स्वामी पदांबुजांवरी । मस्तक ठेविले झडकरी । सदगदित झाले अंतरी । हर्ष पोटी न सामावे ॥२०॥
उठोनिया करिती स्तुती । धन्य धन्य हे यतिमूर्ती । केवळ परमेश्वर असती । रुप घेती मानवाचे ॥२१॥
मी आज कित्येक दिवस । हठयोगसाधन करायास । केले बहुत सायास । परी सर्व व्यर्थ गेले ॥२२॥
स्वामीकृपा आज झाली । तेणे माझी इच्छा पुरली । चिंता सकल दूर झाली । कार्यभाग साधला ॥२३॥
असो नृसिंहसरस्वती । आळंदी क्षेत्री परतोन येती । तेथेचि वास्तव्य करिती । सिद्धी प्रसन्न जयांना ॥२४॥
बहुत धर्मकृत्ये केली । दूरदूर कीर्ति गेली । काही दिवशी एकेवेळी । अक्कलकोटी पातले ॥२५॥
घेतले समर्थाचे दर्शन । उभे राहिले कर जोडोनि । झाले बहुत समाधान ॥२६॥
पाहोनी नृसिंहसरस्वतीसी । समर्थ बोलले त्या समयासी । लोकी धन्यता पावलासी । वारयोषिता पाळोनी ॥२७॥
तियेसी द्यावे सोडोनी । तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी । मग सहजचि सुरभुवनी । अंती जासी सुखाने ॥२८॥
ऐकोनी समर्थांची वाणी । आश्चर्य वाटले सकला मनी । नृसिंहसरस्वती स्वामी असोनी । विपरीत केवी करितील ॥२९॥
परी अंतरीची खूण । यति तत्काळ जाणोन । पाहो लागले अधोवदन । शब्द एक न बोलवे ॥३०॥
सिद्धी करोनी प्रसन्न । वाढविले आपुले महिमान । तेचि वारयोषितेसमान । अर्थ स्वामीवचनाचा ॥३१॥
असो तेव्हापासोनि । सिद्धी दिधली सोडोनी । येवोनी राहिले स्वस्थानी । धर्मकृत्ये बहु केली ॥३२॥
यशवंतराव भोसेकर । नामे देव मामलेदार । त्यासीही ज्ञान साचार । समर्थकृपेने जहाले ॥३३॥
ऐसे सच्छिष्य अनेक । श्रीकृपेने ज्ञानी विशेष । ज्यांनी ओळखिले आत्मस्वरुप । महिमा त्यांचा न वर्णवे ॥३४॥
वासुदेव ब्राह्मण थोर । ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र । इंग्रजी अंमलात अनिवार । होऊनी बंड केले ज्यांनी ॥३५॥
समर्थांची कृपा होता । इच्छित कार्य साधेल तत्त्वता । ऐसे वाटले त्याचे चित्ता । दर्शनाते पातला ॥३६॥
करी नग्न तलवार । घेवोन आला श्रीसमोर । घालोन साष्टांग नमस्कार । मनामाजी प्रार्थीत ॥३७॥
स्वकार्य चिंतोनि अंतरीं । खङ्ग दिधले श्रीच्या करी । म्हणे मजवरी कृपा जरी । तरी खङ्ग हाती देतील ॥३८॥
जावोनि बैसला दूर । श्रीनी जाणिले अंतर । त्यांचे पाहोनि कर्म घोर । राजद्रोह मानसी ॥३९॥
लगबगे उठली स्वारी । सत्वर आली बाहेरी । तरवडाचे झाडावरी । तलवार दिली टाकोनी ॥४०॥
वासुदेवराव पाहोनी । खिन्न झाला अंतः करणी । समर्थांते आपुली करणी । नावडे सर्वथा म्हणतसे ॥४१॥
कार्य आपण योजिले । ते शेवटा न जाय भले । ऐसे समर्थे दर्शविले । म्हणूनी न दिले खङ्ग करी ॥४२॥
परी तो अभिमानी पुरुष । खङ्ग घेवोनि तैसेच । आला परत स्वस्थानास । झेंडा उभारिला बंडाचा ॥४३॥
त्यात त्यासी यश न आले । सर्व हेतू निष्फळ झाले । शेवटी पारिपत्य भोगले । कष्ट गेले व्यर्थचि ॥४४॥
असो स्वामीचे भक्त । तात्या भोसले विख्यात । राहती अक्कलकोटात । राजाश्रित सरदार ॥४५॥
काही कारण जहाले । संसारी मन विटले । मग प्रपंचाते सोडिले । भक्त झाले स्वामींचे ॥४६॥
मायापाश तोडोनी । दृढ झाले स्वामीचरणी । भजन पूजन निशिदिनी । करिताती आनंदे ॥४७॥
अकस्मात एके दिवशी । भयभीत झाले मानसी । यमदूत दिसती दृष्टीसी । मृत्यूसमय पातला ॥४८॥
पाहोनिया विपरीत परी । श्रीचरण धरिले झडकरी । उभा राहिला काळ दूरी । नवलपरी जाहले ॥४९॥
दीन वदन होवोनी । दृढ घातली मिठी चरणी । तात्या करिती विनवणी । मरण माझे चुकवावे ॥५०॥
ते पाहोनी श्रीसमर्थ । कृतान्तासी काय सांगत । हा असे माझा भक्त । आयुष्य याचे न सरले ॥५१॥
पैल तो वृषभ दिसत । त्याचा आज असे अंत । त्यासी न्यावे त्वा त्वरित । स्पर्श याते करु नको ॥५२॥
ऐसे समर्थ बोलले । तोची नवल वर्तले । तत्काळ वृषभाचे प्राण गेले । धरणी पडले कलेवर ॥५३॥
जन पाहोनी आश्चर्य करिती । धन्यता थोर वर्णिताती । बैलाप्रती दिधली मुक्ती । मरण चुकले तात्यांचे ॥५४॥
ऐशा लीला असंख्य । वर्णू जाता वाढेल ग्रंथ । हे स्वामीचरित्र सारामृत । चरित्रसारमात्र येथे ॥५५॥
जयाची लीला अगम्य । ध्याती ज्याते निगमागम । सुर - नर वर्णिताती गुण । अनादिसिद्ध परमात्मा ॥५६॥
नानारुपे नटोनी । स्वेच्छे विचरे जो या जनी । भक्ता सन्मार्ग दाखवोनी । भवसागरी तारीत ॥५७॥
त्या परमात्म्याचा अवतार । श्रीस्वामी यति दिगंबर । प्रगट झाले धरणीवर । जगदुद्धाराकारणे ॥५८॥
त्यांची पदसेवा निशिदिनी । करोनी तत्पर सदा भजनी । विष्णू शंकराचे मनी । हेचि वसो सदैव ॥५९॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । एकोणविसावा अध्याय गोड हा ॥६०॥
॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
सच्चरित्रे श्रवण करिता । परमानंद होय चित्ता । ओळखू ये सत्यासत्यता । परमार्थ प्रपंचाची ॥२...॥
या नरदेहा येवोन । काय करावे आपण । जेणे होईल सुगम । दुस्तर हा भवपंथ ॥३॥
ज्यांसी वानिती भले । सज्जन ज्या मार्गे गेले । सर्व दुःखमुक्त झाले । तो पंथ धरावा ॥४॥
बोलणे असो हे आता । वर्णूं पुढे स्वामीचरिता । अत्त्यादरे श्रवण करिता । सर्वार्थ पाविजे निश्चये ॥५॥
प्रसिद्ध आळंदी क्षेत्री । नामे नृसिंहसरस्वती । जयांची सर्वत्र ख्याती । अजरामर राहिली ॥६॥
कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र । ती देखिली त्यांनी समस्त । नाना योग्याभासी बहुत । महासाधू देखिले ॥७॥
करावे हठयोगसाधन । ऐसी इच्छा बहुत दिन । नाना स्थाने फिरोन । शोध करीती गुरुचा ॥८॥
जपी तपी संन्यासी । देखिले अनेक तापसी । जे सदा अरण्यवासी । योगाभ्यासी बैसले ॥९॥
एक सूर्यमंडळ विलोकिती । एक पंचाग्निसाधन करिती । एक वायू भक्षिताती । मौन धरिती कितीएक ॥१०॥
एक झाले दिगंबर । एकी केला उर्ध्व कर । एक घालिती नमस्कार । एक ध्यानस्थ बैसले ॥११॥
एक आश्रमी राहोन । शिष्या सांगती गुह्यज्ञान । एक करिती तीर्थाटन । एक पूजनी बैसले ॥१२॥
ऐसे असंख्य देखिले । ज्ञान तयांचे पाहिले । कित्येकांचे चरण धरिले । परि गेले व्यर्थची ॥१३॥
ठयोग परम कठीण । कैसा करावा साध्य आपण । याविषयी पूर्ण ज्ञान । कोणी तयाते सांगेना ॥१४॥
एके समयी अक्कलकोटी । स्वामीदर्शनेच्छा । धरुनी पोटी । आले नृसिंहसरस्वती । महिमा श्रीचा ऐकोनी ॥१५॥
नृसिंहसरस्वती दर्शनासी । येती कळले समर्थांसी । जाणिले त्यांच्या हदगतासी । अंतरामाजी आधीच ॥१६॥
सन्मुख पाहोनी तयांना । आज्ञाचक्र भेदांतला । एक श्लोक सत्वर म्हटला । श्रवणी पडला तयांच्या ॥१७॥
श्लोक ऐकता तेथेचि । समाधी लागली साची । स्मृति न राहिली देहाची । ब्रह्मारंध्री प्राणवायू ॥१८॥
आश्चर्य करिती सकळ । असो झालिया काही वेळ । समाधी उतरोनी तत्काळ । नृसिंहसरस्वती धावले ॥१९॥
स्वामी पदांबुजांवरी । मस्तक ठेविले झडकरी । सदगदित झाले अंतरी । हर्ष पोटी न सामावे ॥२०॥
उठोनिया करिती स्तुती । धन्य धन्य हे यतिमूर्ती । केवळ परमेश्वर असती । रुप घेती मानवाचे ॥२१॥
मी आज कित्येक दिवस । हठयोगसाधन करायास । केले बहुत सायास । परी सर्व व्यर्थ गेले ॥२२॥
स्वामीकृपा आज झाली । तेणे माझी इच्छा पुरली । चिंता सकल दूर झाली । कार्यभाग साधला ॥२३॥
असो नृसिंहसरस्वती । आळंदी क्षेत्री परतोन येती । तेथेचि वास्तव्य करिती । सिद्धी प्रसन्न जयांना ॥२४॥
बहुत धर्मकृत्ये केली । दूरदूर कीर्ति गेली । काही दिवशी एकेवेळी । अक्कलकोटी पातले ॥२५॥
घेतले समर्थाचे दर्शन । उभे राहिले कर जोडोनि । झाले बहुत समाधान ॥२६॥
पाहोनी नृसिंहसरस्वतीसी । समर्थ बोलले त्या समयासी । लोकी धन्यता पावलासी । वारयोषिता पाळोनी ॥२७॥
तियेसी द्यावे सोडोनी । तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी । मग सहजचि सुरभुवनी । अंती जासी सुखाने ॥२८॥
ऐकोनी समर्थांची वाणी । आश्चर्य वाटले सकला मनी । नृसिंहसरस्वती स्वामी असोनी । विपरीत केवी करितील ॥२९॥
परी अंतरीची खूण । यति तत्काळ जाणोन । पाहो लागले अधोवदन । शब्द एक न बोलवे ॥३०॥
सिद्धी करोनी प्रसन्न । वाढविले आपुले महिमान । तेचि वारयोषितेसमान । अर्थ स्वामीवचनाचा ॥३१॥
असो तेव्हापासोनि । सिद्धी दिधली सोडोनी । येवोनी राहिले स्वस्थानी । धर्मकृत्ये बहु केली ॥३२॥
यशवंतराव भोसेकर । नामे देव मामलेदार । त्यासीही ज्ञान साचार । समर्थकृपेने जहाले ॥३३॥
ऐसे सच्छिष्य अनेक । श्रीकृपेने ज्ञानी विशेष । ज्यांनी ओळखिले आत्मस्वरुप । महिमा त्यांचा न वर्णवे ॥३४॥
वासुदेव ब्राह्मण थोर । ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र । इंग्रजी अंमलात अनिवार । होऊनी बंड केले ज्यांनी ॥३५॥
समर्थांची कृपा होता । इच्छित कार्य साधेल तत्त्वता । ऐसे वाटले त्याचे चित्ता । दर्शनाते पातला ॥३६॥
करी नग्न तलवार । घेवोन आला श्रीसमोर । घालोन साष्टांग नमस्कार । मनामाजी प्रार्थीत ॥३७॥
स्वकार्य चिंतोनि अंतरीं । खङ्ग दिधले श्रीच्या करी । म्हणे मजवरी कृपा जरी । तरी खङ्ग हाती देतील ॥३८॥
जावोनि बैसला दूर । श्रीनी जाणिले अंतर । त्यांचे पाहोनि कर्म घोर । राजद्रोह मानसी ॥३९॥
लगबगे उठली स्वारी । सत्वर आली बाहेरी । तरवडाचे झाडावरी । तलवार दिली टाकोनी ॥४०॥
वासुदेवराव पाहोनी । खिन्न झाला अंतः करणी । समर्थांते आपुली करणी । नावडे सर्वथा म्हणतसे ॥४१॥
कार्य आपण योजिले । ते शेवटा न जाय भले । ऐसे समर्थे दर्शविले । म्हणूनी न दिले खङ्ग करी ॥४२॥
परी तो अभिमानी पुरुष । खङ्ग घेवोनि तैसेच । आला परत स्वस्थानास । झेंडा उभारिला बंडाचा ॥४३॥
त्यात त्यासी यश न आले । सर्व हेतू निष्फळ झाले । शेवटी पारिपत्य भोगले । कष्ट गेले व्यर्थचि ॥४४॥
असो स्वामीचे भक्त । तात्या भोसले विख्यात । राहती अक्कलकोटात । राजाश्रित सरदार ॥४५॥
काही कारण जहाले । संसारी मन विटले । मग प्रपंचाते सोडिले । भक्त झाले स्वामींचे ॥४६॥
मायापाश तोडोनी । दृढ झाले स्वामीचरणी । भजन पूजन निशिदिनी । करिताती आनंदे ॥४७॥
अकस्मात एके दिवशी । भयभीत झाले मानसी । यमदूत दिसती दृष्टीसी । मृत्यूसमय पातला ॥४८॥
पाहोनिया विपरीत परी । श्रीचरण धरिले झडकरी । उभा राहिला काळ दूरी । नवलपरी जाहले ॥४९॥
दीन वदन होवोनी । दृढ घातली मिठी चरणी । तात्या करिती विनवणी । मरण माझे चुकवावे ॥५०॥
ते पाहोनी श्रीसमर्थ । कृतान्तासी काय सांगत । हा असे माझा भक्त । आयुष्य याचे न सरले ॥५१॥
पैल तो वृषभ दिसत । त्याचा आज असे अंत । त्यासी न्यावे त्वा त्वरित । स्पर्श याते करु नको ॥५२॥
ऐसे समर्थ बोलले । तोची नवल वर्तले । तत्काळ वृषभाचे प्राण गेले । धरणी पडले कलेवर ॥५३॥
जन पाहोनी आश्चर्य करिती । धन्यता थोर वर्णिताती । बैलाप्रती दिधली मुक्ती । मरण चुकले तात्यांचे ॥५४॥
ऐशा लीला असंख्य । वर्णू जाता वाढेल ग्रंथ । हे स्वामीचरित्र सारामृत । चरित्रसारमात्र येथे ॥५५॥
जयाची लीला अगम्य । ध्याती ज्याते निगमागम । सुर - नर वर्णिताती गुण । अनादिसिद्ध परमात्मा ॥५६॥
नानारुपे नटोनी । स्वेच्छे विचरे जो या जनी । भक्ता सन्मार्ग दाखवोनी । भवसागरी तारीत ॥५७॥
त्या परमात्म्याचा अवतार । श्रीस्वामी यति दिगंबर । प्रगट झाले धरणीवर । जगदुद्धाराकारणे ॥५८॥
त्यांची पदसेवा निशिदिनी । करोनी तत्पर सदा भजनी । विष्णू शंकराचे मनी । हेचि वसो सदैव ॥५९॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । एकोणविसावा अध्याय गोड हा ॥६०॥
॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
श्री स्वामी चरित्र सारामृत,अध्याय १८
श्री गणेशाय नमः ॥ स्वामीसुताच्या गादीवरी । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न सेवेकरी । करिताती समर्थांते ॥१॥
तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत । परी एकही मजला त्यात । योग्य कोणी दिसेना ॥२॥
जेव्ह...ा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी । अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥
मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा । रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥
आमुची पायाची वीट । जतन करावी नीट । वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥
लपवूनी ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी । याचा अर्थ करणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥
असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहात होता । स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥
तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान । त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥
काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी । एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥
बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी । निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥
समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी । आरोग्य होईल बाळासी । चिंता मानसी करु नको ॥११॥
त्याप्रमाणे बाई करिता । दादासी झाली आरोग्यता । समर्थांची कृपा होता । रोग कोठे राहील ॥१२॥
केजगांव मोगलाईत । तेथे नानासाहेब भक्त । त्यांनी बांधिला श्रींचा मठ । द्रव्य बहुत खर्चिले ॥१३॥
श्रींची आज्ञा घेऊनी सत्य । पादुका स्थापाव्या मठात । याकारणे अक्कलकोटी येत । दर्शन घेत समर्थांचे ॥१४॥
ते म्हणती काकूबाईसी । पादुका स्थापन करायासी । तुम्ही पाठवा दादासी । समागमे आमुच्या ॥१५॥
बाई म्हणे तो अज्ञान । तशात शरीरी असमाधान । त्याची काळजी घेईल कोण । सत्य सांगा मजलागी ॥१६॥
परी आज्ञा देतील समर्थ । तरी पाठवीन मी सत्य । मग समर्थांजवळी येत । घेवोनिया दादासी ॥१७॥
समर्थे वृत्त एकोन । म्हणती द्यावे पाठवून । बाळ जरी आहे अज्ञ । तरी सांभाळू तयासी ॥१८॥
काकूबाई बहुत प्रकारे । समर्था सांगे मधुरोत्तरे । दादासी पाठविणे नाही बरे । वर्जावे आपण सर्वाते ॥१९॥
समर्थ तियेसी बोलले । त्यात तुमचे काय गेले । आम्हांसी दिसेल जे भले । तेच आम्ही करु की ॥२०॥
शेवटी मंडळी सांगाती । दादासी पाठविले केजेप्रती । पादुका स्थापन झाल्यावरती । दादा आला परतोनी ॥२१॥
पुढे सेवेकर्यां सांगाती । त्यासी मुंबईस पाठविती । ब्रह्मचार्यांसी आज्ञा करिती । यासी स्थापा गादीवरी ॥२२॥
ब्रह्मचारीबुवांजवळी । दादासी नेत मंडळीं । जी समर्थे आज्ञा केली । ती सांगितली तत्काळ ॥२३॥
दादासी करुनी गोसावी । मुंबईची गादी चालवावी । स्वामीसुताची यासी द्यावी । कफनी झोळी निशाण ॥२४॥
ब्रह्मचारी दादासी । उपदेशिती दिवस निशी । गोसावी होऊनी गादीसी । चालवावे आपण ॥२५॥
दादा जरी अज्ञान होता । तरी ऐशा गोष्टीकरीता । नकार म्हणेची सर्वथा । न रुचे चित्ता त्याचिया ॥२६॥
यापरी ब्रह्मचार्यांनी । पाहिली खटपट करोनी । शेवटी दादांसी मुंबईहूनी । अक्कलकोटा पाठविले ॥२७॥
दादास घेऊनी सत्वरी । श्रीसन्निध आले टाळकरी । तेव्हा दादा घेवोनी तुंबरी । भजन करीत आनंदे ॥२८॥
समर्थे ऐसा समयासी । आज्ञा केली भुजंगासी । घेऊनी माझ्या पादुकांसी । मस्तकी ठेव दादाच्या ॥२९॥
मोर्चेल आणूनि सत्वरी । धरा म्हणती त्यावरी । आज्ञेपमाणे सेवेकरी । करिताती तैसेचि ॥३०॥
श्रींच्या पादुका शिरी पडता । उपरती झाली त्याच्या चित्ता । हदयी प्रगटला ज्ञानसविता । अज्ञान गेले लयाते ॥३१॥
दादा भजनी रंगला । देहभानहि विसरला । स्वस्वरुपी लीन झाला । सर्व पळाला अहंभाव ॥३२॥
धन्य गुरुचे महिमान । पादुका स्पर्श करोन । जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान । काय धन्यता वर्णावी ॥३३॥
असो दादांची पाहून वृत्ती । काकूबाई दचकली चित्ती । म्हणे समर्थे दादांप्रती । वेड खचित लाविले ॥३४॥
ती म्हणे जी समर्था । आपण हे काय करता । दादांचिया शिरी ठेविता । पादुका काय म्हणोनी ॥३५॥
समर्थ बोलले तयेसी । जे बरे वाटले आम्हासी । तेचि करु या समयासी । व्यर्थ बडबड करु नको ॥३६॥
काकूबाई बोले वचन । एकासी गोसावी बनवोन । टाकिला आपण मारुन । इतुकेचि पुरे झाले ॥३७॥
ऐकोन ऐशा वचनाला । समर्थांसी क्रोध आला । घाला म्हणती बाईला । खोड्यामाजी सत्वर ॥३८॥
काकूबाईने आकांत । करुनिया मांडिला अनर्थ । नाना अपशब्द बोलत । भाळ पिटीत स्वहस्ते ॥३९॥
परी समर्थे त्या समयीं । लक्ष तिकडे दिले नाही । दादांसी बनविले गोसावी । कफनी झोळी अर्पिली ॥४०॥
दुसरे दिवशी दादांसी । समर्थ पाठविती भिक्षेसी । ते पाहूनी काकूबाईसी । दुःख झाले अपार ॥४१॥
लोळे समर्थांच्या चरणांवरी । करुणा भाकी पदर पसरी । विनवीतसे नानापरी । शोक करी अपार ॥४२॥
समर्थांसी हसू आले । अधिकचि कौतुक मांडिले । दादांसी जवळ बोलाविले । काय सांगितले तयासी ॥४३॥
अनुसया तुझी माता । तिजपाशी भिक्षा माग आता । अवश्य म्हणोनी तत्त्वता । जननीजवळ पातला ॥४४॥
ऐसे बाईंने पाहोनी । क्रोधाविष्ट अंतःकरणी । म्हणे तुझी ही करणी । लोकापवादाकारण ॥४५॥
भिक्षान्न आपण सेवावे । हे नव्हेची जाण बरवे । चाळे अवघे सोडावे । संसारी व्हावे सुखाने ॥४६॥
ऐकोनी वचन । उदास झाले तिचे मन । असो दादा गोसावी होवोन । स्वामीभजनी रंगले ॥४८॥
काही दिवस झाल्यावरी । मग आले मुंबापुरी । स्वामीसुताच्या गादीवरी । बसोन संस्था चालविली ॥४९॥
कलियुगी दिवसेदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥५०॥
दोघा बंधूंचे ऐसे वृत्त । वर्णिले असे संकलित । केला नाही विस्तार येथ । सार मात्र घेतले ॥५१॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत ।
अष्टदशोऽध्याय गोड हा ॥५३॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत । परी एकही मजला त्यात । योग्य कोणी दिसेना ॥२॥
जेव्ह...ा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी । अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥
मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा । रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥
आमुची पायाची वीट । जतन करावी नीट । वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥
लपवूनी ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी । याचा अर्थ करणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥
असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहात होता । स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥
तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान । त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥
काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी । एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥
बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी । निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥
समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी । आरोग्य होईल बाळासी । चिंता मानसी करु नको ॥११॥
त्याप्रमाणे बाई करिता । दादासी झाली आरोग्यता । समर्थांची कृपा होता । रोग कोठे राहील ॥१२॥
केजगांव मोगलाईत । तेथे नानासाहेब भक्त । त्यांनी बांधिला श्रींचा मठ । द्रव्य बहुत खर्चिले ॥१३॥
श्रींची आज्ञा घेऊनी सत्य । पादुका स्थापाव्या मठात । याकारणे अक्कलकोटी येत । दर्शन घेत समर्थांचे ॥१४॥
ते म्हणती काकूबाईसी । पादुका स्थापन करायासी । तुम्ही पाठवा दादासी । समागमे आमुच्या ॥१५॥
बाई म्हणे तो अज्ञान । तशात शरीरी असमाधान । त्याची काळजी घेईल कोण । सत्य सांगा मजलागी ॥१६॥
परी आज्ञा देतील समर्थ । तरी पाठवीन मी सत्य । मग समर्थांजवळी येत । घेवोनिया दादासी ॥१७॥
समर्थे वृत्त एकोन । म्हणती द्यावे पाठवून । बाळ जरी आहे अज्ञ । तरी सांभाळू तयासी ॥१८॥
काकूबाई बहुत प्रकारे । समर्था सांगे मधुरोत्तरे । दादासी पाठविणे नाही बरे । वर्जावे आपण सर्वाते ॥१९॥
समर्थ तियेसी बोलले । त्यात तुमचे काय गेले । आम्हांसी दिसेल जे भले । तेच आम्ही करु की ॥२०॥
शेवटी मंडळी सांगाती । दादासी पाठविले केजेप्रती । पादुका स्थापन झाल्यावरती । दादा आला परतोनी ॥२१॥
पुढे सेवेकर्यां सांगाती । त्यासी मुंबईस पाठविती । ब्रह्मचार्यांसी आज्ञा करिती । यासी स्थापा गादीवरी ॥२२॥
ब्रह्मचारीबुवांजवळी । दादासी नेत मंडळीं । जी समर्थे आज्ञा केली । ती सांगितली तत्काळ ॥२३॥
दादासी करुनी गोसावी । मुंबईची गादी चालवावी । स्वामीसुताची यासी द्यावी । कफनी झोळी निशाण ॥२४॥
ब्रह्मचारी दादासी । उपदेशिती दिवस निशी । गोसावी होऊनी गादीसी । चालवावे आपण ॥२५॥
दादा जरी अज्ञान होता । तरी ऐशा गोष्टीकरीता । नकार म्हणेची सर्वथा । न रुचे चित्ता त्याचिया ॥२६॥
यापरी ब्रह्मचार्यांनी । पाहिली खटपट करोनी । शेवटी दादांसी मुंबईहूनी । अक्कलकोटा पाठविले ॥२७॥
दादास घेऊनी सत्वरी । श्रीसन्निध आले टाळकरी । तेव्हा दादा घेवोनी तुंबरी । भजन करीत आनंदे ॥२८॥
समर्थे ऐसा समयासी । आज्ञा केली भुजंगासी । घेऊनी माझ्या पादुकांसी । मस्तकी ठेव दादाच्या ॥२९॥
मोर्चेल आणूनि सत्वरी । धरा म्हणती त्यावरी । आज्ञेपमाणे सेवेकरी । करिताती तैसेचि ॥३०॥
श्रींच्या पादुका शिरी पडता । उपरती झाली त्याच्या चित्ता । हदयी प्रगटला ज्ञानसविता । अज्ञान गेले लयाते ॥३१॥
दादा भजनी रंगला । देहभानहि विसरला । स्वस्वरुपी लीन झाला । सर्व पळाला अहंभाव ॥३२॥
धन्य गुरुचे महिमान । पादुका स्पर्श करोन । जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान । काय धन्यता वर्णावी ॥३३॥
असो दादांची पाहून वृत्ती । काकूबाई दचकली चित्ती । म्हणे समर्थे दादांप्रती । वेड खचित लाविले ॥३४॥
ती म्हणे जी समर्था । आपण हे काय करता । दादांचिया शिरी ठेविता । पादुका काय म्हणोनी ॥३५॥
समर्थ बोलले तयेसी । जे बरे वाटले आम्हासी । तेचि करु या समयासी । व्यर्थ बडबड करु नको ॥३६॥
काकूबाई बोले वचन । एकासी गोसावी बनवोन । टाकिला आपण मारुन । इतुकेचि पुरे झाले ॥३७॥
ऐकोन ऐशा वचनाला । समर्थांसी क्रोध आला । घाला म्हणती बाईला । खोड्यामाजी सत्वर ॥३८॥
काकूबाईने आकांत । करुनिया मांडिला अनर्थ । नाना अपशब्द बोलत । भाळ पिटीत स्वहस्ते ॥३९॥
परी समर्थे त्या समयीं । लक्ष तिकडे दिले नाही । दादांसी बनविले गोसावी । कफनी झोळी अर्पिली ॥४०॥
दुसरे दिवशी दादांसी । समर्थ पाठविती भिक्षेसी । ते पाहूनी काकूबाईसी । दुःख झाले अपार ॥४१॥
लोळे समर्थांच्या चरणांवरी । करुणा भाकी पदर पसरी । विनवीतसे नानापरी । शोक करी अपार ॥४२॥
समर्थांसी हसू आले । अधिकचि कौतुक मांडिले । दादांसी जवळ बोलाविले । काय सांगितले तयासी ॥४३॥
अनुसया तुझी माता । तिजपाशी भिक्षा माग आता । अवश्य म्हणोनी तत्त्वता । जननीजवळ पातला ॥४४॥
ऐसे बाईंने पाहोनी । क्रोधाविष्ट अंतःकरणी । म्हणे तुझी ही करणी । लोकापवादाकारण ॥४५॥
भिक्षान्न आपण सेवावे । हे नव्हेची जाण बरवे । चाळे अवघे सोडावे । संसारी व्हावे सुखाने ॥४६॥
ऐकोनी वचन । उदास झाले तिचे मन । असो दादा गोसावी होवोन । स्वामीभजनी रंगले ॥४८॥
काही दिवस झाल्यावरी । मग आले मुंबापुरी । स्वामीसुताच्या गादीवरी । बसोन संस्था चालविली ॥४९॥
कलियुगी दिवसेदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥५०॥
दोघा बंधूंचे ऐसे वृत्त । वर्णिले असे संकलित । केला नाही विस्तार येथ । सार मात्र घेतले ॥५१॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत ।
अष्टदशोऽध्याय गोड हा ॥५३॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
श्री स्वामी चरित्र सारामृत,अध्याय १७
श्री गणेशाय नमः ॥ मागील अध्यायी कथा सुंदर । प्रख्यात जे मुंबई शहर । तेथे येऊनी स्वामीकुमर । मठ स्थापिती समर्थांचा ॥१॥
षडविकार जिंकिले । संसाराते त्यागिले । रात्रंदिन रत झाले । स्वामी भजनी सुखाने ॥२॥
स...्वात्मसुखी तल्लीन वृत्ती । तेणे हरली संसृति । कवणाची नाही भीती । सदा चित्ती आनंद ॥३॥
स्वामीनामाचे भजन । त्यांचिया चरित्राचे कीर्तन । त्याहुनी व्यवसाय अन्य । स्वामीसुत नेणती ॥४॥
संसाराते सोडोन । बैसले गोसावी होवोन । हे पाहूनी कित्येकजण । हांसताती तयाते ॥५॥
परी त्याचा विषाद चित्ती । स्वामीसुत न मानिती । अंगी बाणली पूर्ण विरक्ति । विषयासक्ति नसेची ॥६॥
स्वामीसुताची जननी । काकूबाई नामे करोनी । तिने हे वृत्त ऐकोनी । दुःख केले अनिवार ॥७॥
मोहावर्ती सापडले । मायावश जे झाले । त्यांसी प्रपंचावेगळे । गोड काही न लागेची ॥८॥
पुत्रवात्सल्येकरोनी पाही । शोक करीत काकूबाई । मुंबईत लवलाही । सुताजवळी पातल्या ॥९॥
गोसावी निजसुता पाहोनी । वक्षःस्थळ घेती बडवोनी । अंग टाकीयले धरणी । बहुत आक्रोश मांडीला ॥१०॥
निजमातेचा शोक पाहोन । दुःखित झाले अंतःकरण । तियेलागी सावरुन । धरिले सत्वर प्रेमाने ॥११॥
तुझ्या उदरी जन्मास आलो । सदगुरुपायी विनटलो । जन्ममरणाते चुकलो । मुक्त झालो सहजची ॥१२॥
धन्य धन्य तू गे जननी । मजलागी प्रसवोनी । मान्य झालीस त्रिभुवनी । काय धन्यता वर्णावी ॥१३॥
अशा प्रकारे स्वामीसुत । मातेचे समाधान करीत । मधुर शब्दे समजावीत । परमार्थ गोष्टी सांगोनी ॥१४॥
परी त्याच्या या गोष्टी । तियेसी गोड न लागती । म्हणे याची भ्रष्ट मती । खचित असे जाहली ॥१५॥
यासी पिशाच्चबाधा झाली । किंवा कोणी करणी केली । याची सोय पाहिजे पाहिली । पंचाक्षरी आणोनी ॥१६॥
त्या समयी प्रख्यात थोर । यशवंतराव भोसेकर । जयांसी देव मामलेदार । सर्व लोक बोलती ॥१७॥
तयांची घेवोन भेटी । विचारावी काही युक्ती । ते जरी कृपा करिती । तरी होय आरोग्य ॥१८॥
ऐसा विचार करोनी पोटी । दर्शना आल्या उठाउठी । सांगितल्या सुताच्या गोष्टी । मुळापासोन सर्वहि ॥१९॥
होवोनिया दीनवदन । करिती विनंती कर जोडोन । म्हणती सर्वज्ञ आपण । उपाय यासी सांगावा ॥२०॥
ऐकोनिया देव मामलेदार । हांसोनी देती उत्तर । त्यासी पिशाच्च लागले थोर । माझेनी दूर नोहेची ॥२१॥
ऐसे उत्तर ऐकोनि । दुःखित झाले अंतःकरणी । मग ते स्वामीसुताची जननी । अक्कलकोटी येतसे ॥२२॥
म्हणे ज्याने वेड लाविले । त्याचीच धरावी पाउले । येणे उपाये आपुले । कार्य सत्य होईल ॥२३॥
असो इकडे स्वामीसुत । मुंबईमाजी वास्तव्य करीत । हिंदू पारसी स्वामीभक्त । त्यांच्या उपदेशे जहाले ॥२४॥
मठ होता कामाठीपुर्यात । तेथे जागा नव्हती प्रशस्त । मग दिली कांदेवाडीत । जागा एक भक्तिणीने ॥२५॥
निस्सीम जे स्वामीभक्त । आनंदे भजनी नाचत । कुटील जन त्याते हासत । ढोंग अवघे म्हणती हे ॥२६॥
परी निंदा आणि स्तुती । दोन्ही समान जे मानिती । श्रीचरणांवीण आसक्ति । अन्य विषयावरी नसे ॥२७॥
जन निंदा करिताती । अनेक प्रकारे दूषण देती । परी शांत चित्ते त्याप्रती । उपदेशिती स्वामीसुत ॥२८॥
जे अहंकारे बुडले । सत्य पथाचरण चुकले । नित्य कार्यांते विसरले । मोहे पडले भवजाली ॥२९॥
ऐसे जे का मूढ जन । ते भक्ता देती दूषण । परी तेणे अंतःकरण । दुःखित नोहे तयांचे ॥३०॥
तारा नामे त्यांची कांता । तेही त्रास देती स्वामीसुता । परी तयांच्या चित्ता । दुःख खेद नसेची ॥३१॥
प्रथम मुंबई शहरात । शके सत्राशे त्र्याण्णवात । फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस । स्वामी जयंती केलीसे ॥३२॥
कोणे एके समयासी । नगरकर नाना जोशी । सहज आले मुंबईसी । त्यांनी ऐकिले वर्तमान ॥३३॥
या नगरांत सांप्रत । स्वामीसुत स्वामीभक्त । गोसावी होऊनी राहात । महाज्ञानी असती ते ॥३४॥
एकवार पहावे तयांसी । इच्छा झाली नानांसी । मग कोणे एके समयासी । मठामाजी पातले ॥३५॥
पाहुनी स्वामीसुताप्रती । आनंदले नाना चित्ती । प्रेमानंदे चरण वंदिती । स्तवन करिती तयांचे ॥३६॥
स्वामीसुते तयासी । लावियले स्वामीभक्तीसी । धन्य झाले नाना जोशी । रंगले भजनी समर्थांच्या ॥३७॥
ऐसे कित्येक सज्जन । स्वामीसुते शिष्य करोन । वाढविले महात्म्य पूर्ण । श्रीसमर्थ भक्तींचे ॥३८॥
पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करोनी । ती अर्पावया श्रीचरणी । अक्कलकोटी पातले ॥३९॥
पत्रिका श्रीचरनी अर्पिली । स्वामीमूर्ती आनंदली । समर्थे त्यांसी आज्ञा केली । नगारा वाजवा म्हणोनी ॥४०॥
नगारा वाजविता जोशी । हसू आले समर्थांसी । पाहोनिया स्वभक्तासी । परमानंद जाहला ॥४१॥
अक्कलकोटी स्वामीसुत । श्रीसन्निध भजन करीत । कीर्तनी आनंदे नाचत । लोकलज्जा सोडोनी ॥४२॥
लोकापवादाचे मनी भय । तो भक्ती करील काय । प्रेमानंद चित्त नोहे । भजनी मन लागेना ॥४३॥
त्रिविध जन नानारीती । निंदा स्तुति करिताती । खेदानंद मानिता चित्ती । चित्तवृत्ति द्विधा होय ॥४४॥
असो अक्कलकोट नगरांत । शके सतराशे त्र्याण्णवात । प्रथम स्वामी जयंती करीत । स्वामीसुत आनंदे ॥४५॥
छेली खेडे ग्रामांत । प्रथम स्वामी प्रगट होत । विजयसिंग नामे भक्त । गोट्या खेळत त्यांसवे ॥४६॥
ऐसे स्वामीसुताचे मत । परी दिसे आधाररहित । सत्यासत्य जाणती समर्थ । आपण तेथे अज्ञानी ॥४७॥
स्वामीसुत दिवसेदिवस । स्वामीभक्ती करी विशेष । जन लाविले भजनास । कीर्तिध्वज उभारीला ॥४८॥
मनामाजी धरुनी कामना । कोणी येताचि दर्शना । त्यासी समर्थ करिती आज्ञा । सुताकडे जावयाची ॥४९॥
स्वामीसुतहि त्यांप्रती । मनांतील खूण सांगती । ऐकोनी जन चकित होती । वर्णिती ख्याती सुताची ॥५०॥
एकदा सहज स्वामीसुत । अक्कलकोटी दर्शना येत । तेव्हा समर्थ राजवाड्यात । राहिले होते आनंदे ॥५१॥
राणीचिये आज्ञेवाचोनि । दर्शन नोहे कोणालागोनी । ऐसे वर्तमान ऐकोनी । खिन्न मनी स्वामीसुत ॥५२॥
स्वामीदर्शन घेतल्याविण । तो न सेवी उदकान्न । ऐसे दिवस झाले तीन । निराहार राहिला ॥५३॥
मग वाड्यासमोर जावोन । आरंभिले प्रेमळ भजन । जे करुणरसे भरले पूर्ण । ऐकिले आंतून राणीने ॥५४॥
हा समर्थांचा निस्सीम भक्त । आनंदे भजनी नाचत । समर्थ दर्शनाची धरित । दृढ इच्छा अंतरी ॥५५॥
सेवकांसी म्हणे सत्वरी । तुम्ही जाऊनी या अवसरी । त्य साधूते मंदिरी । प्रार्थोनिया आणावे ॥५६॥
ऐसी राणीची आज्ञा होता । सेवक धावले तत्त्वता । प्रार्थूनिया स्वामीसुता । मंदिरामाजी आणिले ॥५७॥
पाहोनिया समर्थांसी । उल्हास सुताचे मानसी । धावोनिया वेगेसी । मिठी चरणी घातली ॥५८॥
सदगदित अंतःकरणी । चरण क्षाळिले नयनाश्रूंनी । देहभान गेले विसरोनी । स्वामीपदी सुखावला ॥५९॥
बाळ चुकले मातेसी । ते भेटले बहुत दिवसी । मग तयांच्या आनंदासी । पारावार नसेची ॥६०॥
निजसुताते पाहोनी । आनंदले समर्थ मनी । कर फिरविला मुखावरुनी । हस्ती धरुनी उठविले ॥६१॥
अक्कलकोटी त्या अवसरी । बहुत होते सेवेकरी । परी समर्थांची प्रीति खरी । स्वामीसुतावरी होती ॥६२॥
त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन । दूषित होय त्यांचे मन । द्वेष पूर्ण करिताती ॥६३॥
काही उपाय करोन । फिरवोन समर्थांचे मन । स्वामीसुतावरचे प्रेम । कमी करु पाहताती ॥६४॥
स्वामीसुत रात्रंदिन । समर्थांपुढे करिती भजन । पायी खडावा घालोन । प्रेमरंगे नाचती ॥६५॥
एके दिवशी श्रीसमर्थ । बैसले असता आनंदात । स्वामीसुत भजन करीत । पायी खडावा घालोन ॥६६॥
ऐशी वेळ साधोनी । समर्थां सांगितले दुर्जनी । स्वामीसुत हे करणी । योग्य नसे सर्वथा ॥६७॥
बैसला असता आपण । पायी खडावा घालोन । हा नाचतो काय म्हणून । आपुला अपमान करावया ॥६८॥
परकी आणि निजसुत । समान लेखिती जे सत्य । जे सर्वांसी आलिप्त । श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते ॥६९॥
आता खडावा काढोनी । मग नाचावे त्वां भजनी । ऐशी आज्ञा सुतालागोनी । केली समर्थे त्या वेळी ॥७०॥
तोच उठले कित्येकजण । खडावा घेतल्या काढोन । स्वामीसुताचा अपमान । केला ऐशा प्रकारे ॥७१॥
पाहोनिया ऐशी परी । खिन्न झाला सुत अंतरी । काळजात बोचली सुरी । अपमान दुःखे दुखावला ॥७२॥
मरणाहुनी परम कठीण । दुःख देतसे अपमान । उतरले सुताचे वदन । निस्तेज झाले सत्वर ॥७३॥
तयाते होते जे वैरी । ते आनंदले अंतरी । म्हणती मोडली खोड बरी । अभिमान उतरला ॥७४॥
असो मग स्वामीसुत । ते स्थळ सोडोनी त्वरित । नगराबाहेर येत । मार्ग धरीत मुंबईचा ॥७५॥
अपमान दुःखे दुखावला । अंतरी बहू खिन्न झाला । परतोनी नाही आला । जन्मभरी अक्कलकोटी ॥७६॥
स्वाभिमानी जो नर । त्याचे दुखविता अंतर । ते दुःख जन्मभर । त्याच्या मनी जाचतसे ॥७७॥
त्या दुःखे उत्तरोत्तर । क्षीण झाला स्वामीकुमर । दुःख करी दिवसरात्र । चैन नसे क्षणभरी ॥७८॥
तोची रोग लागला । शेवटी आजारी पडला । ऐसा समाचार समजला । अक्कलकोटी समर्थाते ॥७९॥
स्वामीसुताची जननी । राहातसे त्या स्थानी । तिने हे वर्तमान ऐकोनी । विनवीत समर्थाते ॥८०॥
म्हणे कृपा करोनिया । सुतात ए आणावे या ठाया । कृपादृष्टी पाहोनिया । आरोग्य तया करावे ॥८१॥
मग समर्थे त्या अवसरी । मुंबईस पाठविले सेवेकरी । म्हणती सुताते सत्वरी । मजसन्निध आणावे ॥८२॥
परी सुत त्या सांगाती । आला नाही अक्कलकोटी । अपमान दुःख त्याचे पोटी । रात्रंदिन सलतसे ॥८३॥
सेवेकरी परतोनी आले । समर्थांते वृत्त कथिले । आणखी दुसरे पाठविले । त्यांची गती तीच झाली ॥८४॥
मग सांगती समर्थ । त्यासी घालोनि पेटीत । घेवोनि यावे त्वरित । कोणी तरी जावोनि ॥८५॥
तथापि स्वामीसुत पाही । अक्कलकोटी आला नाही । दिवसेदिवस देही । क्षीण होत चालला ॥८६॥
शेवटी बोलले समर्थ । आता जरी न ये सत्य । तरी तोफ भरुनी यथार्थ । ठेविली ती उडवू की ॥८७॥
याचा अर्थ स्पष्ट होता । तो समजला स्वामीसुता । परी तो न आला अक्कलकोटा । जीवितपर्वा न केली ॥८८॥
आजार वाढला विशेष । श्रावण शुद्ध प्रतिपदेस । केला असे कैलासवास । सर्व लोक हळहळती ॥८९॥
त्या समयी मुंबईत । तयांचे जे शिष्य होत । त्यांसी झाले दुःख अमित । शोकसागरी बुडाले ॥९०॥
अक्कलकोटी त्या दिनी । समर्थ करिती विचित्र करणी । बैसले स्नान करोनी । परी गंध न लाविती ॥९१॥
भोजनाते न उठती । धरणीवरी अंग टाकिती । कोणासंगे न बोलती । रुदन करिती क्षणोक्षणी ॥९२॥
इतुक्यामाजी सत्वर । मुंबईहूनी आली तार । श्रुत झाला समाचार । स्वामीसुत गत झाला ॥९३॥
उदासिनता त्या दिवशी । आली सर्व नगरासी । चैन न पडे काकूबाईंसी । पुसती समर्था क्षणोक्षणी ॥९४॥
मग काकूबाईंने सत्वर । जवळी केले मुंबापूर । तेथे समजला समाचार । परत्र पावला आत्मज ॥९५॥
निजपुत्रमरणवार्ता । ऐकुनी करिती आकांता । तो दुःखद समय वर्णिता । दुःख अंतरी होतसे ॥९६॥
असो मग काकूबाई । अक्कलकोटी लवलाही । परतोनी आल्या पाही । बोलल्या काय समर्थांते ॥९७॥
सुत आपुला भक्त असोन । अकाली पावला का मरण । मग स्मरती जे हे चरण । त्यांचे तारण होय कैसे ॥९८॥
समर्थ बोलले तियेसी । उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी । संधी सापडली काळासी । ओढूनी बळेची मग नेला ॥९९॥
पुत्रशोके करोन । दुःख करी रात्रंदिन । समर्थ तियेचे समाधान । परोपरी करिताती ॥१००॥
नरजन्मा येऊनी सत्य । भक्ती केली एकनिष्ठ । केले जन्माचे सार्थक । परमपदा पावले ॥१०१॥
उच्च नीच भगवंती । नसे काही निश्चिती । ज्याची असेल जैसी भक्ती । श्रेष्ठ कनिष्ठ तेणेचि ॥१०२॥
धन्य धन्य स्वामीकुमर । उतरला भवौदधि दुस्तर । ख्याती झाली सर्वत्र । कीर्ति अमर राहिली ॥१०३॥
स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न एके अवसरी । पुसती सेवेकरी समर्थाते ॥१०४॥
ते कथा रसाळ अत्यंत । वर्णिले पुढील अध्यायात । श्रोते होऊनी सावधचित्त । अवधान द्यावे कथेसी ॥१०५॥
जयजय श्रीभक्तपालका । जयजयाजी परम मंगला । विष्णू शंकराची विमला । कीर्ति पसरो सर्वत्र ॥१०६॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । भाविक भक्त परिसोत । सप्तदशोऽध्याय गोड हा ॥१०७॥
श्री भगवच्चरणार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतुं ॥
षडविकार जिंकिले । संसाराते त्यागिले । रात्रंदिन रत झाले । स्वामी भजनी सुखाने ॥२॥
स...्वात्मसुखी तल्लीन वृत्ती । तेणे हरली संसृति । कवणाची नाही भीती । सदा चित्ती आनंद ॥३॥
स्वामीनामाचे भजन । त्यांचिया चरित्राचे कीर्तन । त्याहुनी व्यवसाय अन्य । स्वामीसुत नेणती ॥४॥
संसाराते सोडोन । बैसले गोसावी होवोन । हे पाहूनी कित्येकजण । हांसताती तयाते ॥५॥
परी त्याचा विषाद चित्ती । स्वामीसुत न मानिती । अंगी बाणली पूर्ण विरक्ति । विषयासक्ति नसेची ॥६॥
स्वामीसुताची जननी । काकूबाई नामे करोनी । तिने हे वृत्त ऐकोनी । दुःख केले अनिवार ॥७॥
मोहावर्ती सापडले । मायावश जे झाले । त्यांसी प्रपंचावेगळे । गोड काही न लागेची ॥८॥
पुत्रवात्सल्येकरोनी पाही । शोक करीत काकूबाई । मुंबईत लवलाही । सुताजवळी पातल्या ॥९॥
गोसावी निजसुता पाहोनी । वक्षःस्थळ घेती बडवोनी । अंग टाकीयले धरणी । बहुत आक्रोश मांडीला ॥१०॥
निजमातेचा शोक पाहोन । दुःखित झाले अंतःकरण । तियेलागी सावरुन । धरिले सत्वर प्रेमाने ॥११॥
तुझ्या उदरी जन्मास आलो । सदगुरुपायी विनटलो । जन्ममरणाते चुकलो । मुक्त झालो सहजची ॥१२॥
धन्य धन्य तू गे जननी । मजलागी प्रसवोनी । मान्य झालीस त्रिभुवनी । काय धन्यता वर्णावी ॥१३॥
अशा प्रकारे स्वामीसुत । मातेचे समाधान करीत । मधुर शब्दे समजावीत । परमार्थ गोष्टी सांगोनी ॥१४॥
परी त्याच्या या गोष्टी । तियेसी गोड न लागती । म्हणे याची भ्रष्ट मती । खचित असे जाहली ॥१५॥
यासी पिशाच्चबाधा झाली । किंवा कोणी करणी केली । याची सोय पाहिजे पाहिली । पंचाक्षरी आणोनी ॥१६॥
त्या समयी प्रख्यात थोर । यशवंतराव भोसेकर । जयांसी देव मामलेदार । सर्व लोक बोलती ॥१७॥
तयांची घेवोन भेटी । विचारावी काही युक्ती । ते जरी कृपा करिती । तरी होय आरोग्य ॥१८॥
ऐसा विचार करोनी पोटी । दर्शना आल्या उठाउठी । सांगितल्या सुताच्या गोष्टी । मुळापासोन सर्वहि ॥१९॥
होवोनिया दीनवदन । करिती विनंती कर जोडोन । म्हणती सर्वज्ञ आपण । उपाय यासी सांगावा ॥२०॥
ऐकोनिया देव मामलेदार । हांसोनी देती उत्तर । त्यासी पिशाच्च लागले थोर । माझेनी दूर नोहेची ॥२१॥
ऐसे उत्तर ऐकोनि । दुःखित झाले अंतःकरणी । मग ते स्वामीसुताची जननी । अक्कलकोटी येतसे ॥२२॥
म्हणे ज्याने वेड लाविले । त्याचीच धरावी पाउले । येणे उपाये आपुले । कार्य सत्य होईल ॥२३॥
असो इकडे स्वामीसुत । मुंबईमाजी वास्तव्य करीत । हिंदू पारसी स्वामीभक्त । त्यांच्या उपदेशे जहाले ॥२४॥
मठ होता कामाठीपुर्यात । तेथे जागा नव्हती प्रशस्त । मग दिली कांदेवाडीत । जागा एक भक्तिणीने ॥२५॥
निस्सीम जे स्वामीभक्त । आनंदे भजनी नाचत । कुटील जन त्याते हासत । ढोंग अवघे म्हणती हे ॥२६॥
परी निंदा आणि स्तुती । दोन्ही समान जे मानिती । श्रीचरणांवीण आसक्ति । अन्य विषयावरी नसे ॥२७॥
जन निंदा करिताती । अनेक प्रकारे दूषण देती । परी शांत चित्ते त्याप्रती । उपदेशिती स्वामीसुत ॥२८॥
जे अहंकारे बुडले । सत्य पथाचरण चुकले । नित्य कार्यांते विसरले । मोहे पडले भवजाली ॥२९॥
ऐसे जे का मूढ जन । ते भक्ता देती दूषण । परी तेणे अंतःकरण । दुःखित नोहे तयांचे ॥३०॥
तारा नामे त्यांची कांता । तेही त्रास देती स्वामीसुता । परी तयांच्या चित्ता । दुःख खेद नसेची ॥३१॥
प्रथम मुंबई शहरात । शके सत्राशे त्र्याण्णवात । फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस । स्वामी जयंती केलीसे ॥३२॥
कोणे एके समयासी । नगरकर नाना जोशी । सहज आले मुंबईसी । त्यांनी ऐकिले वर्तमान ॥३३॥
या नगरांत सांप्रत । स्वामीसुत स्वामीभक्त । गोसावी होऊनी राहात । महाज्ञानी असती ते ॥३४॥
एकवार पहावे तयांसी । इच्छा झाली नानांसी । मग कोणे एके समयासी । मठामाजी पातले ॥३५॥
पाहुनी स्वामीसुताप्रती । आनंदले नाना चित्ती । प्रेमानंदे चरण वंदिती । स्तवन करिती तयांचे ॥३६॥
स्वामीसुते तयासी । लावियले स्वामीभक्तीसी । धन्य झाले नाना जोशी । रंगले भजनी समर्थांच्या ॥३७॥
ऐसे कित्येक सज्जन । स्वामीसुते शिष्य करोन । वाढविले महात्म्य पूर्ण । श्रीसमर्थ भक्तींचे ॥३८॥
पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करोनी । ती अर्पावया श्रीचरणी । अक्कलकोटी पातले ॥३९॥
पत्रिका श्रीचरनी अर्पिली । स्वामीमूर्ती आनंदली । समर्थे त्यांसी आज्ञा केली । नगारा वाजवा म्हणोनी ॥४०॥
नगारा वाजविता जोशी । हसू आले समर्थांसी । पाहोनिया स्वभक्तासी । परमानंद जाहला ॥४१॥
अक्कलकोटी स्वामीसुत । श्रीसन्निध भजन करीत । कीर्तनी आनंदे नाचत । लोकलज्जा सोडोनी ॥४२॥
लोकापवादाचे मनी भय । तो भक्ती करील काय । प्रेमानंद चित्त नोहे । भजनी मन लागेना ॥४३॥
त्रिविध जन नानारीती । निंदा स्तुति करिताती । खेदानंद मानिता चित्ती । चित्तवृत्ति द्विधा होय ॥४४॥
असो अक्कलकोट नगरांत । शके सतराशे त्र्याण्णवात । प्रथम स्वामी जयंती करीत । स्वामीसुत आनंदे ॥४५॥
छेली खेडे ग्रामांत । प्रथम स्वामी प्रगट होत । विजयसिंग नामे भक्त । गोट्या खेळत त्यांसवे ॥४६॥
ऐसे स्वामीसुताचे मत । परी दिसे आधाररहित । सत्यासत्य जाणती समर्थ । आपण तेथे अज्ञानी ॥४७॥
स्वामीसुत दिवसेदिवस । स्वामीभक्ती करी विशेष । जन लाविले भजनास । कीर्तिध्वज उभारीला ॥४८॥
मनामाजी धरुनी कामना । कोणी येताचि दर्शना । त्यासी समर्थ करिती आज्ञा । सुताकडे जावयाची ॥४९॥
स्वामीसुतहि त्यांप्रती । मनांतील खूण सांगती । ऐकोनी जन चकित होती । वर्णिती ख्याती सुताची ॥५०॥
एकदा सहज स्वामीसुत । अक्कलकोटी दर्शना येत । तेव्हा समर्थ राजवाड्यात । राहिले होते आनंदे ॥५१॥
राणीचिये आज्ञेवाचोनि । दर्शन नोहे कोणालागोनी । ऐसे वर्तमान ऐकोनी । खिन्न मनी स्वामीसुत ॥५२॥
स्वामीदर्शन घेतल्याविण । तो न सेवी उदकान्न । ऐसे दिवस झाले तीन । निराहार राहिला ॥५३॥
मग वाड्यासमोर जावोन । आरंभिले प्रेमळ भजन । जे करुणरसे भरले पूर्ण । ऐकिले आंतून राणीने ॥५४॥
हा समर्थांचा निस्सीम भक्त । आनंदे भजनी नाचत । समर्थ दर्शनाची धरित । दृढ इच्छा अंतरी ॥५५॥
सेवकांसी म्हणे सत्वरी । तुम्ही जाऊनी या अवसरी । त्य साधूते मंदिरी । प्रार्थोनिया आणावे ॥५६॥
ऐसी राणीची आज्ञा होता । सेवक धावले तत्त्वता । प्रार्थूनिया स्वामीसुता । मंदिरामाजी आणिले ॥५७॥
पाहोनिया समर्थांसी । उल्हास सुताचे मानसी । धावोनिया वेगेसी । मिठी चरणी घातली ॥५८॥
सदगदित अंतःकरणी । चरण क्षाळिले नयनाश्रूंनी । देहभान गेले विसरोनी । स्वामीपदी सुखावला ॥५९॥
बाळ चुकले मातेसी । ते भेटले बहुत दिवसी । मग तयांच्या आनंदासी । पारावार नसेची ॥६०॥
निजसुताते पाहोनी । आनंदले समर्थ मनी । कर फिरविला मुखावरुनी । हस्ती धरुनी उठविले ॥६१॥
अक्कलकोटी त्या अवसरी । बहुत होते सेवेकरी । परी समर्थांची प्रीति खरी । स्वामीसुतावरी होती ॥६२॥
त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन । दूषित होय त्यांचे मन । द्वेष पूर्ण करिताती ॥६३॥
काही उपाय करोन । फिरवोन समर्थांचे मन । स्वामीसुतावरचे प्रेम । कमी करु पाहताती ॥६४॥
स्वामीसुत रात्रंदिन । समर्थांपुढे करिती भजन । पायी खडावा घालोन । प्रेमरंगे नाचती ॥६५॥
एके दिवशी श्रीसमर्थ । बैसले असता आनंदात । स्वामीसुत भजन करीत । पायी खडावा घालोन ॥६६॥
ऐशी वेळ साधोनी । समर्थां सांगितले दुर्जनी । स्वामीसुत हे करणी । योग्य नसे सर्वथा ॥६७॥
बैसला असता आपण । पायी खडावा घालोन । हा नाचतो काय म्हणून । आपुला अपमान करावया ॥६८॥
परकी आणि निजसुत । समान लेखिती जे सत्य । जे सर्वांसी आलिप्त । श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते ॥६९॥
आता खडावा काढोनी । मग नाचावे त्वां भजनी । ऐशी आज्ञा सुतालागोनी । केली समर्थे त्या वेळी ॥७०॥
तोच उठले कित्येकजण । खडावा घेतल्या काढोन । स्वामीसुताचा अपमान । केला ऐशा प्रकारे ॥७१॥
पाहोनिया ऐशी परी । खिन्न झाला सुत अंतरी । काळजात बोचली सुरी । अपमान दुःखे दुखावला ॥७२॥
मरणाहुनी परम कठीण । दुःख देतसे अपमान । उतरले सुताचे वदन । निस्तेज झाले सत्वर ॥७३॥
तयाते होते जे वैरी । ते आनंदले अंतरी । म्हणती मोडली खोड बरी । अभिमान उतरला ॥७४॥
असो मग स्वामीसुत । ते स्थळ सोडोनी त्वरित । नगराबाहेर येत । मार्ग धरीत मुंबईचा ॥७५॥
अपमान दुःखे दुखावला । अंतरी बहू खिन्न झाला । परतोनी नाही आला । जन्मभरी अक्कलकोटी ॥७६॥
स्वाभिमानी जो नर । त्याचे दुखविता अंतर । ते दुःख जन्मभर । त्याच्या मनी जाचतसे ॥७७॥
त्या दुःखे उत्तरोत्तर । क्षीण झाला स्वामीकुमर । दुःख करी दिवसरात्र । चैन नसे क्षणभरी ॥७८॥
तोची रोग लागला । शेवटी आजारी पडला । ऐसा समाचार समजला । अक्कलकोटी समर्थाते ॥७९॥
स्वामीसुताची जननी । राहातसे त्या स्थानी । तिने हे वर्तमान ऐकोनी । विनवीत समर्थाते ॥८०॥
म्हणे कृपा करोनिया । सुतात ए आणावे या ठाया । कृपादृष्टी पाहोनिया । आरोग्य तया करावे ॥८१॥
मग समर्थे त्या अवसरी । मुंबईस पाठविले सेवेकरी । म्हणती सुताते सत्वरी । मजसन्निध आणावे ॥८२॥
परी सुत त्या सांगाती । आला नाही अक्कलकोटी । अपमान दुःख त्याचे पोटी । रात्रंदिन सलतसे ॥८३॥
सेवेकरी परतोनी आले । समर्थांते वृत्त कथिले । आणखी दुसरे पाठविले । त्यांची गती तीच झाली ॥८४॥
मग सांगती समर्थ । त्यासी घालोनि पेटीत । घेवोनि यावे त्वरित । कोणी तरी जावोनि ॥८५॥
तथापि स्वामीसुत पाही । अक्कलकोटी आला नाही । दिवसेदिवस देही । क्षीण होत चालला ॥८६॥
शेवटी बोलले समर्थ । आता जरी न ये सत्य । तरी तोफ भरुनी यथार्थ । ठेविली ती उडवू की ॥८७॥
याचा अर्थ स्पष्ट होता । तो समजला स्वामीसुता । परी तो न आला अक्कलकोटा । जीवितपर्वा न केली ॥८८॥
आजार वाढला विशेष । श्रावण शुद्ध प्रतिपदेस । केला असे कैलासवास । सर्व लोक हळहळती ॥८९॥
त्या समयी मुंबईत । तयांचे जे शिष्य होत । त्यांसी झाले दुःख अमित । शोकसागरी बुडाले ॥९०॥
अक्कलकोटी त्या दिनी । समर्थ करिती विचित्र करणी । बैसले स्नान करोनी । परी गंध न लाविती ॥९१॥
भोजनाते न उठती । धरणीवरी अंग टाकिती । कोणासंगे न बोलती । रुदन करिती क्षणोक्षणी ॥९२॥
इतुक्यामाजी सत्वर । मुंबईहूनी आली तार । श्रुत झाला समाचार । स्वामीसुत गत झाला ॥९३॥
उदासिनता त्या दिवशी । आली सर्व नगरासी । चैन न पडे काकूबाईंसी । पुसती समर्था क्षणोक्षणी ॥९४॥
मग काकूबाईंने सत्वर । जवळी केले मुंबापूर । तेथे समजला समाचार । परत्र पावला आत्मज ॥९५॥
निजपुत्रमरणवार्ता । ऐकुनी करिती आकांता । तो दुःखद समय वर्णिता । दुःख अंतरी होतसे ॥९६॥
असो मग काकूबाई । अक्कलकोटी लवलाही । परतोनी आल्या पाही । बोलल्या काय समर्थांते ॥९७॥
सुत आपुला भक्त असोन । अकाली पावला का मरण । मग स्मरती जे हे चरण । त्यांचे तारण होय कैसे ॥९८॥
समर्थ बोलले तियेसी । उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी । संधी सापडली काळासी । ओढूनी बळेची मग नेला ॥९९॥
पुत्रशोके करोन । दुःख करी रात्रंदिन । समर्थ तियेचे समाधान । परोपरी करिताती ॥१००॥
नरजन्मा येऊनी सत्य । भक्ती केली एकनिष्ठ । केले जन्माचे सार्थक । परमपदा पावले ॥१०१॥
उच्च नीच भगवंती । नसे काही निश्चिती । ज्याची असेल जैसी भक्ती । श्रेष्ठ कनिष्ठ तेणेचि ॥१०२॥
धन्य धन्य स्वामीकुमर । उतरला भवौदधि दुस्तर । ख्याती झाली सर्वत्र । कीर्ति अमर राहिली ॥१०३॥
स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न एके अवसरी । पुसती सेवेकरी समर्थाते ॥१०४॥
ते कथा रसाळ अत्यंत । वर्णिले पुढील अध्यायात । श्रोते होऊनी सावधचित्त । अवधान द्यावे कथेसी ॥१०५॥
जयजय श्रीभक्तपालका । जयजयाजी परम मंगला । विष्णू शंकराची विमला । कीर्ति पसरो सर्वत्र ॥१०६॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । भाविक भक्त परिसोत । सप्तदशोऽध्याय गोड हा ॥१०७॥
श्री भगवच्चरणार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतुं ॥
श्री स्वामी चरित्र सारामृत,अध्याय १६
श्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥
जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥
प्रसिद्ध मुंब...ई शहरात । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नौकरीने ॥३॥
कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर । हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥
ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे । त्याच गावी तयांचे । माता - बंधू राहती ॥५॥
मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित । ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥
एके समयी पंडितांनी । स्वामीकीर्ति ऐकिली कानी । तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥
जरी आठ दिवसात । मी होईन कर्जमुक्त । तरी दर्शना त्वरित । अक्कलकोटी येईन ॥८॥
यासी सात दिवस झाले । काही अनुभव न आले । तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥
हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करिता त्यात । आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥
त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती । सर्व वर्तमान त्या सांगती । म्हणती काय करावे ॥११॥
हे नुकसान भरावयासी । द्रव्य नाही आम्हांपाशी । फिर्याद होता अब्रुसी । बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥
तेव्हा पंडित बोलले । मलाही कर्ज काही झाले । निघाले माझे दिवाळे । यात संशय असेना ॥१३॥
तुम्ही व्हावया कर्जमुक्त । यासी करावी युक्ती एक । तुमचा होउनी मी मालक । लिहून देतो पेढीवर ॥१४॥
उभयतांसी ते मानले । तत्काळ तयांपरी केले । तो नवल एक वर्तले । ऐका सादर होवोनी ॥१५॥
अफूचा भाव वाढला । व्यापारात नफा जाहला । हे सांगावया पंडिताला । मारवाडी आला आनंदे ॥१६॥
पंडित ऐकोन वर्तमान । आनंद झाला त्यालागोन । हरीभाऊते भेटोन । वृत्त निवेदन केले ॥१७॥
अक्कलकोटी स्वामी समर्थ । सांप्रतकाळी वास करीत । त्यांचीच कृपा ही सत्य । कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥
नवस केला तयांसी । जाऊ आता दर्शनासी । वार्ता ऐकूनी उभयतांसी । चमत्कार वाटला ॥१९॥
ज्यांनी आपुले मनोरथ । पूर्ण केले असती सत्य । ऐसे जे का समर्थ । अक्कलकोटी नांदती ॥२०॥
तरी अक्कलकोटाप्रती । येतो तुमच्या सांगाती । आम्ही पाहुनिया स्वामीमूर्ती । जन्म सार्थक करु की ॥२१॥
गजानन हरिभाऊ पंडित । त्रिवर्ग अक्कलकोटी जात । समर्थांचे दर्शन घेत । पूजन करीत भक्तीने ॥२२॥
पाहूनी समर्थांची मूर्ती । तल्लीन हरीभाऊंची वृत्ती । मुख पाहता नयनपाती । न लवती तयांची ॥२३॥
तेव्हा समर्थे तयांसी । शिव, राम, मारुती ऐसी । नामे दिधली त्रिवर्गासी । आणिक मंत्र दिधले ॥२४॥
पंडिता राम म्हटले । गजानना शिवनाम दिधले । मारुती हरीभाऊस म्हटले । तिघे केले एकरुप ॥२५॥
मग समर्थे त्या वेळे । त्रिवर्गा जवळ बोलाविले । तिघांशी तीन श्लोक दिधले । मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥
॥ श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुर्देवपरब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥
ऐसा मंत्र हरीभाऊते । दिधला असे समर्थे । तेव्हा तयाच्या आनंदाते । पारावार नसेची ॥२७॥
दुसरा मंत्र गजाननाला । तया वेळी श्रींनी दिधला । तेव्हा तयांच्या मनाला । आनंद झाला बहुसाळ ॥२८॥
॥ श्लोक ॥ आकाशात् पतित तोय यथा गच्छति सागरम् ॥ सर्व - देव - नमस्कारः केशव प्रति गच्छति ॥२॥
संतोषले त्याचे मन । मग पंडिता जवळ घेवोन । एक मंत्र उपदेशोन । केले पावन तयाते ॥२९॥
॥ श्लोक ॥ इदमेव शिवम् इदमेव शिवम् । इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥
तीनशे रुपये तयांनी । आणिले होते मुंबईहूनी । त्यांचे काय करावे म्हणोनी । विचारिले समर्थांते ॥३०॥
ऐसा प्रश्न ऐकोनी । समर्थ बोलले त्या लागोनी । त्यांच्या पादुका बनवोनी । येथे आणाव्या सत्वर ॥३१॥
स्वामीसन्निध काही दिन । त्रिवर्ग राहिले आनंदाने । हरिभाऊंचे तनमन । स्वामींचरणी दृढ जडले ॥३२॥
काही दिवस गेल्यावरी । त्रिवर्ग एके अवसरी । उभे राहूनी जोडल्या करी । आज्ञा मागती जावया ॥३३॥
आज्ञा मिळता तयांसी । आनंदे आले मुंबईसी । हरीभाऊंच्या मानसी । ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥
व्यवहारी वर्तता । स्वस्थता नसेची चित्ता । गोड न लागती संसारवार्ता । चैन नसे क्षणभरी ॥३५॥
असो पुढे त्रिवर्गानी । चांदीच्या पादुका करवोनी । अर्पावया स्वामींचरणी । आले अक्कलकोटाते ॥३६॥
भक्तजनांचा कैवारी । पाहोनिया डोळेभरी । माथा ठेविला चरणांवरी । बहुत अंतरी सुखावले ॥३७॥
चांदीच्या पादुका आणिल्या । त्या श्री चरणीं अर्पण केल्या । समर्थे आदरे घेतल्या । पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥
त्या आत्मलिंग पादुका । चौदा दिवसांपर्यंत देखा । पायी वागवी भक्तसखा । दिधल्या नाही कोणाते ॥३९॥
हरीभाऊ एके दिनी । समर्थांसन्निध येवोनी । दर्शन घेवोन श्रीचरणी । मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥
तो समर्थे त्याप्रती । घेवोनिया मांडीवरती । वरदहस्त सत्वरगती । मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥
म्हणती तू माझा सूत । झालासी आता निश्चित । परिधान करी भगवे वस्त्र । संसार देई सोडोनी ॥४२॥
मग छाटी कफनी झोळी । समर्थे तयांसी दिधली । ती घेवोनी तया वेळी । परिधान केली सत्वर ॥४३॥
आत्मलिंग पादुका सत्वरी । देती हरीभाऊंचे करी । म्हणती जाऊनी सागरतीरी । किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥
धरु नको आता लाज । उभार माझा यशध्वज । नको करु अन्य काज । जन भजना लावावे ॥४५॥
जाऊनी आता सत्वर । लुटवी आपुला संसार । लोभ मोह अणुमात्र । चित्ती तुवा न धरावा ॥४६॥
आज्ञा ऐकोनिया ऐसी । आनंद झाला मानसी । सत्वर आले मुंबईसी । साधूवेष घेवोनी ॥४७॥
सदगुरुने मस्तकी हस्त । ठेविता झाले ज्ञानवंत । धन्य धन्य ते स्वामीसुत । धन्य स्वामी दयाळ ॥४८॥
सदगुरुचा उपदेश होता । तात्काळ गेली भवव्यथा । उपरती झाली चित्ता । षडविकार निमाले ॥४९॥
बहुत गुरु जगी असती । नाना मंत्र उपदेशिती । द्रव्यप्राप्तीस्तव निश्चिती । ढोंग माजविती बहुत ॥५०॥
तयांचा उपदेश न फळे । आत्मरुपी मन न वळे । सत्यज्ञान काही न कळे । मन न चळे प्रपंची ॥५१॥
तयांसी न म्हणावे गुरु । ते केवळ पोटभरु । भवसागर पैलतीरु । उतरतील ते कैसे ॥५२॥
तैसे नव्हेची समर्थ । जे परमेश्वर साक्षात । मस्तकी ठेविता वरदहस्त । दिव्यज्ञान शिष्यांते ॥५३॥
असो हरीभाऊंनी काय केले । ब्राह्मणांसी बोलाविले । संकल्प करोनी ठेविले । तुळसीपत्र घरावरी ॥५४॥
हरीभाऊ घर लुटविता । तारा नामे त्यांची कांता । ती करी बहुत आकांता । घेत ऊर बडवोनी ॥५५॥
म्हणे जोडोनिया कर । लुटविता तुम्ही संसार । हा नव्हे विचार । दुःख लागेल भोगावे ॥५६॥
आजवर अब्रूने । दिवस काढिले आपण । परी आता अवलक्षण । आपणा काय आठवले ॥५७॥
हांसतील सकल जन । धिक्कारतील पिशून । उपास पडता कोण । खावयाते घालील ॥५८॥
अल्पवयी आपणासी । बुद्धी सुचली ही कैसी । त्यागोनिया संसारसुखासी । दुःखडोही का पडता ॥५९॥
संसारसुख भोगोन । पुढे येता वृद्धपण । मग करावे मोक्षसाधन । सेवावे वन तपार्थ ॥६०॥
आपल्या वडिलांची थोरवी । मनामाजी आणावी । त्यांची कीर्ति मळवावी । उचित नसे आपणा ॥६१॥
तुम्ही संसार सोडोनी । जाऊनी बसाल जरी वनी । तरी मग सांगा कोणी । मजलागी पोसावे ॥६२॥
माझे करिता पाणिग्रहण । अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन । आपण वाहिली असे आण । स्मरण करावे मानसी ॥६३॥
तुम्ही म्हणाल मजसवे । तूहि घरदार सोडावे । मजसमागमे फिरावे । भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥
तरी संसारसुखासक्त । मी असे जी सत्य सत्य । संसारी मन विरक्त । माझे न होय कदाही ॥६५॥
आता जरी आपण । संसार टाकिला लुटोन । हे केले महत्पुण्य । ऐसे कोण म्हणेल ॥६६॥
कुटुंबा उपवासी मारावे । सर्वस्व धर्म करावे । यासी काय पुण्य कार्य म्हणावे । पाप उलटे होतसे ॥६७॥
विनविते जोडोनी कर । अद्यापि स्वस्थ करा अंतर । आपला हा विचार । सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥
ऐशी तियेची उत्तरे । ऐकोनिया स्वामीकुमरे । समाधान बहुत प्रकारे । करीतसे तियेचे ॥६९॥
परी तारेच्या चित्तात । षडरिपु होते जागत । संसाराचे मिथ्यत्त्व । तियेलागी कळेना ॥७०॥
आशा, मनीषा, भ्रांती आणि । कल्पना वासना या डाकिणी । त्यांनी तिजला झडपोनी । आपणाधीन केलेसे ॥७१॥
त्यायोगे सद्विचार । तियेसी न सुचे अणुमात्र । धरोनिया दुराग्रह । स्वामीसुता बोधीतसे ॥७२॥
षडविकार त्यागोनी । रतला जो स्वामीचरणी । दृढ निश्चय केला मनी । संसार त्याग करावा ॥७३॥
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार । तेहि लुटविले समग्र । तिये दिधले शुभ्र वस्त्र । परिधान करावया ॥७४॥
आत्मलिंग समर्थे । स्वामीसुताते दिधले होते । त्या पादुका स्वहस्ते । मठामाजी स्थापिल्या ॥७५॥
कामाठीपुर्यात त्या समयी । मठ स्थापिला असे पाही । हरीभाऊ होऊनी गोसावी । मठामाजी राहिले ॥७६॥
धन्य धन्य ते स्वामीसुत । गुर्वाज्ञेने झाले विरक्त । परी जन त्याते निंदित । नाना दोष देवोनी ॥७७॥
पूर्वजन्मी तप केले । त्याचे फळ प्राप्त झाले । सदगुरुचरणी विनटले । सर्व फिटले भवदुःख ॥७८॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक भक्त परिसोत । षोडशोऽध्याय गोड हा ॥८०॥
श्रीरस्तु । शुभं भवतु ॥
जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥
प्रसिद्ध मुंब...ई शहरात । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नौकरीने ॥३॥
कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर । हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥
ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे । त्याच गावी तयांचे । माता - बंधू राहती ॥५॥
मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित । ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥
एके समयी पंडितांनी । स्वामीकीर्ति ऐकिली कानी । तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥
जरी आठ दिवसात । मी होईन कर्जमुक्त । तरी दर्शना त्वरित । अक्कलकोटी येईन ॥८॥
यासी सात दिवस झाले । काही अनुभव न आले । तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥
हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करिता त्यात । आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥
त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती । सर्व वर्तमान त्या सांगती । म्हणती काय करावे ॥११॥
हे नुकसान भरावयासी । द्रव्य नाही आम्हांपाशी । फिर्याद होता अब्रुसी । बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥
तेव्हा पंडित बोलले । मलाही कर्ज काही झाले । निघाले माझे दिवाळे । यात संशय असेना ॥१३॥
तुम्ही व्हावया कर्जमुक्त । यासी करावी युक्ती एक । तुमचा होउनी मी मालक । लिहून देतो पेढीवर ॥१४॥
उभयतांसी ते मानले । तत्काळ तयांपरी केले । तो नवल एक वर्तले । ऐका सादर होवोनी ॥१५॥
अफूचा भाव वाढला । व्यापारात नफा जाहला । हे सांगावया पंडिताला । मारवाडी आला आनंदे ॥१६॥
पंडित ऐकोन वर्तमान । आनंद झाला त्यालागोन । हरीभाऊते भेटोन । वृत्त निवेदन केले ॥१७॥
अक्कलकोटी स्वामी समर्थ । सांप्रतकाळी वास करीत । त्यांचीच कृपा ही सत्य । कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥
नवस केला तयांसी । जाऊ आता दर्शनासी । वार्ता ऐकूनी उभयतांसी । चमत्कार वाटला ॥१९॥
ज्यांनी आपुले मनोरथ । पूर्ण केले असती सत्य । ऐसे जे का समर्थ । अक्कलकोटी नांदती ॥२०॥
तरी अक्कलकोटाप्रती । येतो तुमच्या सांगाती । आम्ही पाहुनिया स्वामीमूर्ती । जन्म सार्थक करु की ॥२१॥
गजानन हरिभाऊ पंडित । त्रिवर्ग अक्कलकोटी जात । समर्थांचे दर्शन घेत । पूजन करीत भक्तीने ॥२२॥
पाहूनी समर्थांची मूर्ती । तल्लीन हरीभाऊंची वृत्ती । मुख पाहता नयनपाती । न लवती तयांची ॥२३॥
तेव्हा समर्थे तयांसी । शिव, राम, मारुती ऐसी । नामे दिधली त्रिवर्गासी । आणिक मंत्र दिधले ॥२४॥
पंडिता राम म्हटले । गजानना शिवनाम दिधले । मारुती हरीभाऊस म्हटले । तिघे केले एकरुप ॥२५॥
मग समर्थे त्या वेळे । त्रिवर्गा जवळ बोलाविले । तिघांशी तीन श्लोक दिधले । मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥
॥ श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुर्देवपरब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥
ऐसा मंत्र हरीभाऊते । दिधला असे समर्थे । तेव्हा तयाच्या आनंदाते । पारावार नसेची ॥२७॥
दुसरा मंत्र गजाननाला । तया वेळी श्रींनी दिधला । तेव्हा तयांच्या मनाला । आनंद झाला बहुसाळ ॥२८॥
॥ श्लोक ॥ आकाशात् पतित तोय यथा गच्छति सागरम् ॥ सर्व - देव - नमस्कारः केशव प्रति गच्छति ॥२॥
संतोषले त्याचे मन । मग पंडिता जवळ घेवोन । एक मंत्र उपदेशोन । केले पावन तयाते ॥२९॥
॥ श्लोक ॥ इदमेव शिवम् इदमेव शिवम् । इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥
तीनशे रुपये तयांनी । आणिले होते मुंबईहूनी । त्यांचे काय करावे म्हणोनी । विचारिले समर्थांते ॥३०॥
ऐसा प्रश्न ऐकोनी । समर्थ बोलले त्या लागोनी । त्यांच्या पादुका बनवोनी । येथे आणाव्या सत्वर ॥३१॥
स्वामीसन्निध काही दिन । त्रिवर्ग राहिले आनंदाने । हरिभाऊंचे तनमन । स्वामींचरणी दृढ जडले ॥३२॥
काही दिवस गेल्यावरी । त्रिवर्ग एके अवसरी । उभे राहूनी जोडल्या करी । आज्ञा मागती जावया ॥३३॥
आज्ञा मिळता तयांसी । आनंदे आले मुंबईसी । हरीभाऊंच्या मानसी । ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥
व्यवहारी वर्तता । स्वस्थता नसेची चित्ता । गोड न लागती संसारवार्ता । चैन नसे क्षणभरी ॥३५॥
असो पुढे त्रिवर्गानी । चांदीच्या पादुका करवोनी । अर्पावया स्वामींचरणी । आले अक्कलकोटाते ॥३६॥
भक्तजनांचा कैवारी । पाहोनिया डोळेभरी । माथा ठेविला चरणांवरी । बहुत अंतरी सुखावले ॥३७॥
चांदीच्या पादुका आणिल्या । त्या श्री चरणीं अर्पण केल्या । समर्थे आदरे घेतल्या । पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥
त्या आत्मलिंग पादुका । चौदा दिवसांपर्यंत देखा । पायी वागवी भक्तसखा । दिधल्या नाही कोणाते ॥३९॥
हरीभाऊ एके दिनी । समर्थांसन्निध येवोनी । दर्शन घेवोन श्रीचरणी । मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥
तो समर्थे त्याप्रती । घेवोनिया मांडीवरती । वरदहस्त सत्वरगती । मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥
म्हणती तू माझा सूत । झालासी आता निश्चित । परिधान करी भगवे वस्त्र । संसार देई सोडोनी ॥४२॥
मग छाटी कफनी झोळी । समर्थे तयांसी दिधली । ती घेवोनी तया वेळी । परिधान केली सत्वर ॥४३॥
आत्मलिंग पादुका सत्वरी । देती हरीभाऊंचे करी । म्हणती जाऊनी सागरतीरी । किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥
धरु नको आता लाज । उभार माझा यशध्वज । नको करु अन्य काज । जन भजना लावावे ॥४५॥
जाऊनी आता सत्वर । लुटवी आपुला संसार । लोभ मोह अणुमात्र । चित्ती तुवा न धरावा ॥४६॥
आज्ञा ऐकोनिया ऐसी । आनंद झाला मानसी । सत्वर आले मुंबईसी । साधूवेष घेवोनी ॥४७॥
सदगुरुने मस्तकी हस्त । ठेविता झाले ज्ञानवंत । धन्य धन्य ते स्वामीसुत । धन्य स्वामी दयाळ ॥४८॥
सदगुरुचा उपदेश होता । तात्काळ गेली भवव्यथा । उपरती झाली चित्ता । षडविकार निमाले ॥४९॥
बहुत गुरु जगी असती । नाना मंत्र उपदेशिती । द्रव्यप्राप्तीस्तव निश्चिती । ढोंग माजविती बहुत ॥५०॥
तयांचा उपदेश न फळे । आत्मरुपी मन न वळे । सत्यज्ञान काही न कळे । मन न चळे प्रपंची ॥५१॥
तयांसी न म्हणावे गुरु । ते केवळ पोटभरु । भवसागर पैलतीरु । उतरतील ते कैसे ॥५२॥
तैसे नव्हेची समर्थ । जे परमेश्वर साक्षात । मस्तकी ठेविता वरदहस्त । दिव्यज्ञान शिष्यांते ॥५३॥
असो हरीभाऊंनी काय केले । ब्राह्मणांसी बोलाविले । संकल्प करोनी ठेविले । तुळसीपत्र घरावरी ॥५४॥
हरीभाऊ घर लुटविता । तारा नामे त्यांची कांता । ती करी बहुत आकांता । घेत ऊर बडवोनी ॥५५॥
म्हणे जोडोनिया कर । लुटविता तुम्ही संसार । हा नव्हे विचार । दुःख लागेल भोगावे ॥५६॥
आजवर अब्रूने । दिवस काढिले आपण । परी आता अवलक्षण । आपणा काय आठवले ॥५७॥
हांसतील सकल जन । धिक्कारतील पिशून । उपास पडता कोण । खावयाते घालील ॥५८॥
अल्पवयी आपणासी । बुद्धी सुचली ही कैसी । त्यागोनिया संसारसुखासी । दुःखडोही का पडता ॥५९॥
संसारसुख भोगोन । पुढे येता वृद्धपण । मग करावे मोक्षसाधन । सेवावे वन तपार्थ ॥६०॥
आपल्या वडिलांची थोरवी । मनामाजी आणावी । त्यांची कीर्ति मळवावी । उचित नसे आपणा ॥६१॥
तुम्ही संसार सोडोनी । जाऊनी बसाल जरी वनी । तरी मग सांगा कोणी । मजलागी पोसावे ॥६२॥
माझे करिता पाणिग्रहण । अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन । आपण वाहिली असे आण । स्मरण करावे मानसी ॥६३॥
तुम्ही म्हणाल मजसवे । तूहि घरदार सोडावे । मजसमागमे फिरावे । भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥
तरी संसारसुखासक्त । मी असे जी सत्य सत्य । संसारी मन विरक्त । माझे न होय कदाही ॥६५॥
आता जरी आपण । संसार टाकिला लुटोन । हे केले महत्पुण्य । ऐसे कोण म्हणेल ॥६६॥
कुटुंबा उपवासी मारावे । सर्वस्व धर्म करावे । यासी काय पुण्य कार्य म्हणावे । पाप उलटे होतसे ॥६७॥
विनविते जोडोनी कर । अद्यापि स्वस्थ करा अंतर । आपला हा विचार । सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥
ऐशी तियेची उत्तरे । ऐकोनिया स्वामीकुमरे । समाधान बहुत प्रकारे । करीतसे तियेचे ॥६९॥
परी तारेच्या चित्तात । षडरिपु होते जागत । संसाराचे मिथ्यत्त्व । तियेलागी कळेना ॥७०॥
आशा, मनीषा, भ्रांती आणि । कल्पना वासना या डाकिणी । त्यांनी तिजला झडपोनी । आपणाधीन केलेसे ॥७१॥
त्यायोगे सद्विचार । तियेसी न सुचे अणुमात्र । धरोनिया दुराग्रह । स्वामीसुता बोधीतसे ॥७२॥
षडविकार त्यागोनी । रतला जो स्वामीचरणी । दृढ निश्चय केला मनी । संसार त्याग करावा ॥७३॥
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार । तेहि लुटविले समग्र । तिये दिधले शुभ्र वस्त्र । परिधान करावया ॥७४॥
आत्मलिंग समर्थे । स्वामीसुताते दिधले होते । त्या पादुका स्वहस्ते । मठामाजी स्थापिल्या ॥७५॥
कामाठीपुर्यात त्या समयी । मठ स्थापिला असे पाही । हरीभाऊ होऊनी गोसावी । मठामाजी राहिले ॥७६॥
धन्य धन्य ते स्वामीसुत । गुर्वाज्ञेने झाले विरक्त । परी जन त्याते निंदित । नाना दोष देवोनी ॥७७॥
पूर्वजन्मी तप केले । त्याचे फळ प्राप्त झाले । सदगुरुचरणी विनटले । सर्व फिटले भवदुःख ॥७८॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक भक्त परिसोत । षोडशोऽध्याय गोड हा ॥८०॥
श्रीरस्तु । शुभं भवतु ॥
श्री स्वामी चरित्र सारामृत,अध्याय १५
श्री गणेशाय नमः ॥ नलगे करणे तीर्थाटन । हठयोगादिक साधन । वेदाभ्यास शास्त्रज्ञान । मोक्षसाधनकारणे ॥१॥ अंतरी स्वामीभक्ती जडता । चारी पुरुषार्थ येती हाता । पाप ताप दैन्य वार्ता । तेथे काही नुरेची ॥२॥ वर्तत असता संसारी । स्वामीपद आठवी अंतरी । तयाते या भवसागरी । निश्चये तारिती समर्थ ॥३...॥ सर्व कामना पुरवोन । अंती दाविती सुरभुवन । जे नर करिती नामस्मरण । ते मुक्त याच देही ॥४॥ मंगळवेढे ग्रामात । राहत असता श्रीसमर्थ । ग्रामवासी जन समस्त । वेडा म्हणती तयांसी ॥५॥ आपुली व्हावी प्रख्याती । हे नसेचि जयाच्या चित्ती । स्वेच्छे वर्तन करिती । काही न जाणती जनवार्ता ॥६॥ कोणासी भाषण न करिती । कवणाचे गृहा न जाती । दुष्टोत्तरे जन ताडिती । तरी क्रोध नयेची ॥७॥ शीतोष्णाची भीती । नसेची ज्यांचिया चित्ती । सदा अरण्यात वसती । एकान्तस्थळी समर्थ ॥८॥ सुखदुःख समान । सदा तृप्त असे मन । लोकवस्ती आणि व्रन । दोन्ही जया सारखी ॥९॥ परमेश्वरस्वरुप यती । ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती । ते करिता स्वामीभक्ती । जन हासती तयाते ॥१०॥ या वेळी मंगळवेढ्यात । बसाप्पा तेली राहात । दारिद्र्ये पीडिला बहुत । दीन स्थिती तयाची ॥११॥ बसाप्पा व्यवसाय करी । पुरे न पडे त्यामाझारी । अठराविश्वे दारिद्र्य घरी । पोटा भाकरी मिळेना ॥१२॥ तो एके दिनी फिरत फिरत । सहज वनामाजी जात । तो देखिले श्रीसमर्थ । दिगंबर यतिराज ॥१३॥ कंटकशय्या करोन । तियेवरी केले शयन । ऐसे नवल देखोन । लोटांगण घालितसे ॥१४॥ अंतरी पटली खूण । यति ईश्वरांश पूर्ण । म्हणूनी सुखे शयन । कंटकशय्येवरी केले ॥१५॥ अष्टभावे दाटोनी । माथा ठेवी श्रीचरणी । म्हणे कृपाकटाक्षे करोनी । दासाकडे पहावे ॥१६॥ स्वामीचरणांचा स्पर्श होता । ज्ञानी झाला तो तत्त्वता । कर जोडोनिया स्तविता । झाला बहुत प्रकारे ॥१७॥ सकल ब्रह्मांडनायका । कृपाधना भक्तपालका । पाप, ताप आणि दैन्य हारका । विश्वपते जगदगुरु ॥१८॥ पाहुनिया प्रेमळ भक्ती । अंतरी संतोषले यति । वरदहस्त ठेविती । तत्काळ मस्तकी तयाचे ॥१९॥ बसाप्पाचे श्रीचरणी । मन जडले तैपासोनी । राहू लागला निशिदिनी । स्वामीसन्निध आनंदे ॥२०॥ जिकडे जातील समर्थ । तिकडे आपणही जात । ऐसे पाहुनी हासत । कुटिल जन तयाते ॥२१॥ वेड्याच्या नादी लागला । संसार याने सोडिला । घरदार विसरला । वेडा झाला निश्चये ॥२२॥ मग बसाप्पाची कांता । ऐकूनिया ऐशी वार्ता । करीतसे आकांता । म्हणे घर बुडाले ॥२३॥ आधीच आम्ही निर्धन । परी मोलमजुरी करोन । करीत होतो उपजीवन । आता काय करावे ॥२४॥ बसाप्पा येता गृहासी । दुष्टोत्तरे बोले त्यासी । म्हणे सोडिले संसारासी । वेड काय लागले ॥२५॥ परी बसाप्पाचे चित्त । स्वामींचरणी आसक्त । जनापवादा न भीत । नसे चाड कोणाची ॥२६॥ ऐसे लोटले काही दिन । काय झाले वर्तमान । ते होवोनी सावधान । चित्त देउनी ऐकावे ॥२७॥ एके दिवशी अरण्यात । बसाप्पा स्वामीसेवा करीत । तव झाली असे रात । घोर तम दाटले ॥२८॥ चित्त जडले श्रीचरणी । भीती नसे काही मनी । दोन प्रहर होता रजनी । समर्थ उठोनी चालले ॥२९॥ पुढे जाता समर्थ । बसाप्पा मागे चालत । प्रवेशले घोर अरण्यात । क्रूर श्वापदे ओरडती ॥३०॥ आधीच रात्र अंधारी । वृक्ष दाटले नाना परी । मार्ग न दिसे त्या माझारी । चरणी रुतती कंटक ॥३१॥ परी बसाप्पाचे चित्ती । न वाटे काही भीती । स्वामीचरणी जडली वृत्ती । देहभान नसेची ॥३२॥ तो समर्थ केले नवल । प्रगट झाले असंख्य व्याल । भूभाग व्यापिला सकळ । तेजे अग्नीसमान ॥३३॥ पादस्पर्श सर्पा झाला । बसाप्पा भानावरी आला । अपरिमित देखिला । सर्पसमूह चोहीकडे ॥३४॥ वृक्षशाखा अवलोकित । तो सर्पमय दिसत । मागे पुढे पहात । तो दिसत सर्पमय ॥३५॥ वाहोनिया ऐशी परी । भयभीत झाला अंतरी । तो तयासी मधुरोत्तरी । समर्थ काय बोलले ॥३६॥ भिऊ नको या समयी । जितुके पाहिजे तितुके घेई । न करी अनुमान काही । दैव तुझे उदेले ॥३७॥ ऐसे बोलता समर्थ । बसाप्पा भय सोडूनी त्वरित । करी घेवोनि अंगवस्त्र । टाकीत एका सर्पावरी ॥३८॥ गुंडाळोनी सर्पा त्वरित । सत्वर उचलोनी घेत । तव सर्प झाले गुप्त । तेजही नष्ट जाहले ॥३९॥ तेथोनिया परतले । सत्वर ग्रामामाजी आले । बसाप्पासहित बैसले । समर्थ एका देऊळी ॥४०॥ तेथे आपुले अंगवस्त्र । बसाप्पा सोडोनी पहात । तव त्यात सुवर्ण दिसत । सर्प गुप्त झाला ॥४१॥ ऐसे नवल देखोनी । चकित झाला अंतःकरणी । माथा ठेवी स्वामींचरणी । प्रेमाश्रू नयनी वहाती ॥४२॥ त्यासी बोलती यतीश्वर । घरी जावे त्वा सत्वर । सुखे करावा संसार । दारा पुत्रा पोशिजे ॥४३॥ आनंदोनी मानसी । बसाप्पा गेला गृहासी । वर्तमान सांगता कांतेसी । तेहि अंतरी सुखावे ॥४४॥ कृपा होता समर्थांची । वार्ता नुरेची दैन्याची । याविषयी ही बसाप्पाची । गोष्ट साक्ष देतसे ॥४५॥ असो तो बसाप्पा भक्त । संसारसुख उपभोगीत । रात्रदिन '' श्री स्वामी समर्थ '' । मंत्र जपे त्यादरे ॥४६॥ पाप, ताप आणि दैन्य । ज्यांचे दर्शने निरसोन । जाय ते पद रात्रंदिन । प्रेमे विष्णू शंकर ध्याती ॥४७॥ पुढे कथा सुंदर । स्वामीसुताचे चरित्र । मन करोनिया स्थिर । सादर होउनी ऐकावे ॥४८॥ इति श्री स्वामीचरित्रामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक परिसोत । पंचदशोऽध्याय गोड हा ॥४९॥ श्री स्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
Subscribe to:
Posts (Atom)